AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! जाणून घ्या

Asia Cup 2023 IND vs PAK | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र ते कधी जाहीर होईल, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! जाणून घ्या
| Updated on: Jul 12, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई | आशिया कप स्पर्धा 2023 बाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आधी पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी होती. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास विरोध होता. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. तर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली होती. या वादात आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक लांबणीवर पडलं. मात्र त्यानंतर एसीसीने अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने मधला मार्ग काढला.

एसीसीने आशिया कप स्पर्धेच्या प्रमुख तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या. एसीसीने श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 देशांना संयुक्तरित्या यजमानपदाचा मान दिला. स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार असल्याचं ठरलं. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी 9 सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर उर्वरित 4 मॅचेस या पाकिस्तानमध्ये पार पडणार आहेत. स्पर्धेतील सुरुवातीचे सामने हे पाकिस्तानमध्ये पार पडतील.तर त्यानंतर सर्व सामने श्रीलंकेत होतील. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

मात्र अजूनही सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 2 दिवसांमध्ये 14 जुलैपर्यंत आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं. तसेच बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या स्पर्धेत 2 वेळा आमनेसामने भिडणार असल्याचं नक्की समजलं जात आहे. तर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात पोहचले, तर ती तिसरी वेळ ठरेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचं क्रिकेट चाहते हे आवर्जून वाट पाहत आहे. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील दांबुला इथे केलं जाऊ शकतं.

टीम इंडियाची दांबुल्यातील आकडेवारी

टीम इंडियाने आतापर्यंत दांबुला इथे एकूण 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाला या 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर पाकिस्तानने 13 पैकी 4 मॅचमध्ये विजय मिळवलाय. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने टीम इंडियाचा दांबुल्यात वरचष्मा आहे.

दरम्यान आशिया कप स्पर्धेसाठी एकूण 6 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नेपाळ क्रिकेट टीमने पहिल्यांदाच आशिया कपसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ असे 6 संघ सहभागी होतील.

Follow Us
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं.
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल.
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान.
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची.