AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?

IND vs PAK | आज पण मॅच रद्द झाली, तर पुढे काय?. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालच्या मॅचमध्ये सुद्धा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?
ind vs pak Image Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2023 | 8:03 AM
Share

कोलंबो : आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये पावसाने बराच त्रास दिलाय. पावसामुळेच 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमधला सामना रद्द झाला. 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4 राऊंडचा सामना होणार होता. कोलंबोमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यावर पावसाच सावट होतं. त्यामुळे एशियन क्रिकेट काऊन्सिलने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला होता. रविवारी पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे मॅच पूर्ण होऊ शकली नाही. आता हा सामना 11 सप्टेंबरला रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळला जाणार आहे. पण आजही हवामान खराब राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. आता रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पाऊस झाला, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.

पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. आतापर्यंत 24.1 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 2 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य स्थितीमध्ये नव्हतं. त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल. रिझर्व्ह डेच्या दिवशी सुद्धा सामना झाला नाही, मग टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय असेल?. असं झाल्यास टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध 12 सप्टेंबरला आणि बांग्लादेश विरुद्ध 15 सप्टेंबरला होणारा सामना जिंकावाचा लागेल. पाकिस्तान विरुद्ध मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळेल. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे एकूण 5 पॉइंट होतील. त्यानंतर टीम इंडिया आरामात फायनल खेळू शकेल. पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे?

पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांग्लादेशला हरवून दोन-दोन गुण मिळवले आहेत. यावेळी दोन्ही टीम्स टीम इंडियाच्या पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला एक पॉइंट मिळेल. दोन सामन्यात त्यांचे तीन पॉइंट होतील. त्यानंतर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळाव लागेल. ही मॅच जिंकली, तर पाकिस्तानचे 5 पॉइंट होतील. टीम इंडियाने पण आपल्या दोन मॅच जिंकल्या, तर 5 पॉइंट होतील. अशा स्थितीत श्रीलंका आणि बांग्लादेश दोन्ही टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना रंगेल. आतापर्यंत दोन्ही टीम एकदाही आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेल्या नाहीत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.