AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?

IND vs PAK | आज पण मॅच रद्द झाली, तर पुढे काय?. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालच्या मॅचमध्ये सुद्धा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?
ind vs pak Image Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2023 | 8:03 AM
Share

कोलंबो : आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये पावसाने बराच त्रास दिलाय. पावसामुळेच 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमधला सामना रद्द झाला. 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4 राऊंडचा सामना होणार होता. कोलंबोमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यावर पावसाच सावट होतं. त्यामुळे एशियन क्रिकेट काऊन्सिलने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला होता. रविवारी पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे मॅच पूर्ण होऊ शकली नाही. आता हा सामना 11 सप्टेंबरला रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळला जाणार आहे. पण आजही हवामान खराब राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. आता रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पाऊस झाला, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.

पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. आतापर्यंत 24.1 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 2 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य स्थितीमध्ये नव्हतं. त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल. रिझर्व्ह डेच्या दिवशी सुद्धा सामना झाला नाही, मग टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय असेल?. असं झाल्यास टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध 12 सप्टेंबरला आणि बांग्लादेश विरुद्ध 15 सप्टेंबरला होणारा सामना जिंकावाचा लागेल. पाकिस्तान विरुद्ध मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळेल. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे एकूण 5 पॉइंट होतील. त्यानंतर टीम इंडिया आरामात फायनल खेळू शकेल. पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे?

पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांग्लादेशला हरवून दोन-दोन गुण मिळवले आहेत. यावेळी दोन्ही टीम्स टीम इंडियाच्या पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला एक पॉइंट मिळेल. दोन सामन्यात त्यांचे तीन पॉइंट होतील. त्यानंतर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळाव लागेल. ही मॅच जिंकली, तर पाकिस्तानचे 5 पॉइंट होतील. टीम इंडियाने पण आपल्या दोन मॅच जिंकल्या, तर 5 पॉइंट होतील. अशा स्थितीत श्रीलंका आणि बांग्लादेश दोन्ही टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना रंगेल. आतापर्यंत दोन्ही टीम एकदाही आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेल्या नाहीत.

Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.