AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?

IND vs PAK | आज पण मॅच रद्द झाली, तर पुढे काय?. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालच्या मॅचमध्ये सुद्धा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?
ind vs pak Image Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2023 | 8:03 AM
Share

कोलंबो : आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये पावसाने बराच त्रास दिलाय. पावसामुळेच 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमधला सामना रद्द झाला. 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4 राऊंडचा सामना होणार होता. कोलंबोमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यावर पावसाच सावट होतं. त्यामुळे एशियन क्रिकेट काऊन्सिलने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला होता. रविवारी पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे मॅच पूर्ण होऊ शकली नाही. आता हा सामना 11 सप्टेंबरला रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळला जाणार आहे. पण आजही हवामान खराब राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. आता रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पाऊस झाला, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.

पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. आतापर्यंत 24.1 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 2 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य स्थितीमध्ये नव्हतं. त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल. रिझर्व्ह डेच्या दिवशी सुद्धा सामना झाला नाही, मग टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय असेल?. असं झाल्यास टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध 12 सप्टेंबरला आणि बांग्लादेश विरुद्ध 15 सप्टेंबरला होणारा सामना जिंकावाचा लागेल. पाकिस्तान विरुद्ध मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळेल. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे एकूण 5 पॉइंट होतील. त्यानंतर टीम इंडिया आरामात फायनल खेळू शकेल. पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे?

पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांग्लादेशला हरवून दोन-दोन गुण मिळवले आहेत. यावेळी दोन्ही टीम्स टीम इंडियाच्या पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला एक पॉइंट मिळेल. दोन सामन्यात त्यांचे तीन पॉइंट होतील. त्यानंतर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळाव लागेल. ही मॅच जिंकली, तर पाकिस्तानचे 5 पॉइंट होतील. टीम इंडियाने पण आपल्या दोन मॅच जिंकल्या, तर 5 पॉइंट होतील. अशा स्थितीत श्रीलंका आणि बांग्लादेश दोन्ही टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना रंगेल. आतापर्यंत दोन्ही टीम एकदाही आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेल्या नाहीत.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.