AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्यात रिझर्व्ह डे च सत्य काय? बांग्लादेश-श्रीलंकेचे कोच एक बाोलतात आणि बोर्ड वेगळं

IND vs PAK | नेमकं कोणाच खरं मानायचं?. एक प्रकारे हा अन्यायकारक निर्णय आहे. फॅन्स आणि मीडियाने सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये येत्या 10 सप्टेंबरला सामना होणार आहे.

IND vs PAK सामन्यात रिझर्व्ह डे च सत्य काय? बांग्लादेश-श्रीलंकेचे कोच एक बाोलतात आणि बोर्ड वेगळं
ind vs pak match asia cup 2023Image Credit source: acc
| Updated on: Sep 09, 2023 | 8:10 AM
Share

कोलंबो : यंदाच्या आशिया कप 2023 स्पर्धेत काही मुद्यांवरुन वाद निर्माण झाले आहेत. आधी स्पर्धेच यजमानपद, त्यानंतर वेन्यू बदलण्यावरुन वाद सुरु आहे. आता त्यात आणखी एका नवीन मुद्याची भर पडली आहे. कोलंबोमध्ये सुपर-4 राऊंडच्या सामन्यांना पावसापासून धोका आहे. त्यात एशियन क्रिकेच काऊन्सिलने अचानक फक्त भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ची घोषणा केली आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. सुपर-4 च्या अन्य सामन्यांसाठी अशी व्यवस्था नाहीय. त्यामुळे मीडिया, फॅन्सनी हा निर्णय चुकीचा असल्याच म्हटलं आहे. आता या वादावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे. पण त्यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. कोलंबो येथे भारत-पाकिस्तानमध्ये 10 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आल्याची घोषणा ACC ने शुक्रवारी केली.

म्हणजे 10 सप्टेंबरला होणारा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तरी ही मॅच 11 सप्टेंबरला खेळवली जाईल. आतापर्यंत फक्त 17 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलसाठी ही व्यवस्था होती. पण कोलंबोमध्ये सतत पाऊस सुरु आहे, पावसामुळे अडथळा येऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊ ACC ने हा निर्णय घेतलाय. या निर्णयाने अनेक जण हैराण झाले आहेत. कारण कोलंबोमध्ये फक्त भारत-पाकिस्तान नाही, बांग्लादेश-श्रीलंकेच्या टीम सुद्धा भिडणार आहेत. पण या सामन्यासाठी अशी व्यवस्था नाहीय. फक्त एका मॅचसाठी अशा प्रकारे नियम बदलणं हे धक्कादायक आहे. असा निर्णय घेताना, श्रीलंका आणि बांग्लादेश तुम्ही विचारलत का ? असा प्रश्न आता विचारला जातोय.

बांग्लादेश-श्रीलंका बोर्डाने काय म्हटलय?

या मुद्यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर बांग्लादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन यावर स्पष्टीकरण दिलय. बांग्लादेश बोर्डाने शुक्रवारी रात्री एक टि्वट केलं. ACC च्या टेक्निकल समितीने हा निर्णय घेतल्याच त्यांनी सांगितलं. सुपर-4 मध्ये सहभागी होणाऱ्या चार टीम्स आणि ACC ने सर्व सहमतीने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही हेच म्हटलय. सहतमीनंतरच भारत-पाक सामन्यासाठी रिझर्व्ड डे ठेवण्यात आला आहे. कोचेसच म्हणणं वेगळं

दोन्ही देशाच्या बोर्डाने हे म्हटलय. त्यामुळे हे अधिकृत वक्तव्य मानल जातय. शनिवारी श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये सामना होतोय. त्याआधी प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही टीम्सच्या कोचेसेनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. आम्हाला सुद्धा रिझर्व्ह डे हवा होता, असं बांग्लादेश टीमचे कोच चंदिका हतुरुसिंघा म्हणाले. श्रीलंकेचे कोच क्रिस सिल्वरवुड सरळ म्हणाले, हा तर अन्याय आहे.

Follow Us
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....