AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : टीम इंडियाची अंतिम फेरीकडे कूच, अंतिम फेरीत या संघाशी होणार लढत!

आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. सुपर 4 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. अंतिम फेरीत कोणता संघ समोर येऊ शकतो ते समीकरण समजून घ्या.

Asia Cup 2025 : टीम इंडियाची अंतिम फेरीकडे कूच, अंतिम फेरीत या संघाशी होणार लढत!
Asia Cup 2025 : टीम इंडियाची अंतिम फेरीकडे कूच, अंतिम फेरीत या संघाशी होणार लढत!Image Credit source: ACC
| Updated on: Sep 22, 2025 | 5:16 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेची अंतिम फेरीचं गणित आता चुरशीचं होणार आहे. सुपर 4 फेरीत सर्व सामने जिंकणारा संघ अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे. पण तीन पैकी दोन सामने जिंकणारा कोणता संघ अंतिम फेरी गाठेल असा प्रश्न आहे. सुपर 4 फेरीत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यात भारत विरुद्ध पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश हे सामने पार पडले. यात भारत आणि बांगलादेशने सामना जिंकला असून पाकिस्तान श्रीलंकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे दोन गुण आणि नेट रनरेट चांगला असल्याने भारतीय संघ टॉपला आहे. भारताचा नेट रनरेट हा 0.689 इतका आहे. तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि 0.121 नेट रनरेट आहे. भारत आणि बांगलादेशला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील पुढील सामना खूप महत्त्वाचा असेल.

पाकिस्तानच्या अंतिम फेरीच्या आशा अजूनही कायम

पाकिस्तानच्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला आता त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानचा पुढील सुपर 4 सामना 23 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. हा सामना अंतिम फेरीच्या शर्यतीत एका संघाला गाशा गुंडाळण्यास भाग पाडणार आहे. या सामन्यातील पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा सामना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, हा सामना जिंकणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम राहील पण निश्चित नाही. कारण नंतर हे प्रकरण नेट रनरेटच्या गणितात बसेल.

…जर तसं झालं तर बांग्लादेश अंतिम फेरीत

बांगलादेशने पहिल्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेला हरवून मोठा धक्का दिला. बांगलादेशचे पुढील दोन सामने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा सामना 24 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारताने हा सामना जिंकला तरी बांगलादेशच्या स्पर्धेतील आशा कायम राहतील. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यास बांग्लादेश अंतिम फेरी गाठेल. त्यामुळे 25 सप्टेंबरचा पाकिस्तान बांग्लादेश हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

श्रीलंकेला असेल संधी

श्रीलंकेने पहिला सामना गमावला असला तरी अजूनही आशा आहेत. श्रीलंकन संघाने उर्वरित दोन सामने जिंकले की हे गणित सुटेल. हे सामने पाकिस्तान आणि भारताविरुद्ध आहेत. अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी श्रीलंकेला दोन्ही सामने जिंकावे लागतील. श्रीलंका पाकिस्तान सामना करो या मरोची लढाई आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.