AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangaldesh Crisis: देशात तणावपूर्ण स्थिती, बांगलादेश क्रिकेट टीमचा मोठा निर्णय

Bangaldesh Cricket Team: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देशातील परिस्थितीमुळे अद्याप टीमची घोषणा केलेली नाही.

Bangaldesh Crisis: देशात तणावपूर्ण स्थिती, बांगलादेश क्रिकेट टीमचा मोठा निर्णय
bangladesh cricket teamImage Credit source: Hannah Peters/Getty Images
| Updated on: Aug 11, 2024 | 12:44 AM
Share

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्ट पासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. मात्र बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून भयानक स्थिती आहे. त्यामुळे अद्याप बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचे खेळाडू या निर्णयानंतर लवकरच पाकिस्तानच्या दिशेने रवाना होतील.

पाकिस्तान-बागंलादेश कसोटी मालिका

पाकिस्तान-बागंलादेश कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे होणार आहे. बांगलादेशने या वेळापत्रकात बदल केला आहे. बांगलादेश या मालिकेसाठी 17 ऑग्सटला रवाना होणार होती. मात्र आता टीम 12 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसाठी कूच करणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला बांगलादेश कोचिंग स्टाफमधील विदेशी सदस्यांना सराव सत्रात सहभागी होता येणार नाही. कारण बांगलादेश दूतावासाने देशातील अराजकतेमुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

उभयसंघातील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग आहे. पहिला सामना हा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडीत आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना कराचीत खेळवण्यात येणार आहे. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट टीम 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान गद्दाफी स्टेडियममध्ये सराव करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी इस्लामाबादला रवाना होणार आहे. इस्लामाबाद येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेश 2020 नंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौरा करत आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर, कराची

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम: शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.