
बीसीसीआयने गुरुवारी 26 मार्च रोजी टीम इंडियाचं मायदेशातील वेळापत्रक जाहीर केलं. त्यानंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध कोणती मालिका आणि किती सामने खेळणार? हे स्पष्ट झालं आहे. टीम इंडिया एकूण 4 संघांविरुद्ध 22 सामने खेळणार आहे. एकूण 17 ठिकाणी हे 22 सामने होणार आहेत. टीम इंडियाच्या मायदेशातील हंगामाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यानंतर होणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता ही 19 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशातील हंगामातील आपली पहिला मालिका विंडीज विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर झिंबाब्वे भारत दौऱ्यावर येणार आहे. झिंबाब्वे याआधी 2002 साली भारत दौऱ्यावर आली होती. झिंबाब्वेने नुक्त्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या वर्ल्ड चॅम्पियन संघाला गार केलं होतं.
पहिला सामना, 3 जानेवारी, कोलकाता
दुसरा सामना, 6 जानेवारी, तिरुवनंतपुरम
तिसरा सामना, 9 जानेवारी, मुंबई