AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकदा क्रिकेट सोडल्यानंतर…” विराट कोहलीने निवृत्तीवर केलं थेट भाष्य

विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेदरम्यान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे. विराट कोहली आता 35 वर्षांचा आहे.

एकदा क्रिकेट सोडल्यानंतर... विराट कोहलीने निवृत्तीवर केलं थेट भाष्य
| Updated on: May 16, 2024 | 6:51 PM
Share

भारतीय क्रिकेट इतिहासात विराट कोहली हे खूप मोठं नाव आहे. विराट कोहली म्हंटलं की खोऱ्याने धावा करणारा फलंदाज म्हणून छबी समोर येते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची खेळी प्रत्येकाला माहिती आहे. विराट कोहली 2008 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला झेंडा रोवून आहे. एक दशकाहून अधिक काळ विराट कोहलीने क्रीडारसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण कोणत्याही क्रिकेटरला एक ना एक दिवस या क्रिकेटला रामराम ठोकावा लागतो. क्रिकेटरच्या कारकिर्दीला वयाची खूप मोठी मर्यादा असते. कारण ठरावीक वयोमानानंतर तितकी खेळी करणं शक्य होत नाही. असं असताना विराट कोहलीने आपल्या निवृत्तीबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. तसेच मनातलं सर्वकाही उघड केलं आहे.

आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये 35 वर्षीय विराट कोहली म्हणाला की, “पश्चाताप न करता जगण्याची इच्छा हीच प्रेरणा आहे. मला कोणतेही काम अपूर्ण ठेवायचे नाही जेणेकरून नंतर पश्चाताप होऊ नये. काम झाल्यावर मी निघून जाईन आणि काही काळ पुन्हा दिसणार नाही.” 35 वर्षीय कोहलीचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोहलीने टीम इंडियाच्या टी20 संघातून निवृत्ती जाहीर केली तरी आश्चर्य वाटायला नको.

“जोपर्यंत मी खेळत आहे तिथपर्यंत मला माझं सर्वस्व खेळाला द्यायचं आहे. ही माझी प्रेरणा आहे.”, असं विराट कोहली पुढे म्हणाला. “प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये एक शेवटची वेळ येते. मी सुद्धा कायम खेळत राहाणार नाही. पण त्या दिवशी ते केलं असतं तर बरं झालं असतं, या भावनेत राहायचं नाही.”, असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघात विराट कोहली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. गेल्या 11 वर्षापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.दुसरीकडे, विराट कोहलीने आयपीएलमध्ये एकूण 8 शतकं झळकावली आहेत. तसेच सध्याच्या स्पर्धेत 13 सामन्यात खेळत 661 धावा केल्या आहेत. त्याच्या डोक्यावर गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅप आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.