AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकने आधीच हार मानली? पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, भारतच सरस

सर्वच जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत. कारण क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहता येणार आहे.

IND vs PAK: पाकने आधीच हार मानली? पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, भारतच सरस
Ind vs pakImage Credit source: File photo
| Updated on: Aug 19, 2022 | 2:00 PM
Share

मुंबई: काही दिवसातच आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धा सुरु होणार आहे. 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती मध्ये ही स्पर्धा सुरु होत आहे. सर्वच जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत. कारण क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहता येणार आहे. आशिया कप आणि त्यानंतर आयसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ या सामन्याची जोरदार तयारी करत आहेत. पण पाकिस्तानला आपल्याच देशातून पाठिंबा मिळत नाहीय. माजी लेग स्पिनर दानिशा कनेरिया (Danish Kaneria) यांनी, या सामन्यात भारताची बाजू वरचढ असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पाकिस्तानचा संघ नदरलँड्स विरुद्ध सीरीज खेळतोय. दोन्ही संघ आपआपली तयारी करत आहेत. 28 ऑगस्टला होणाऱ्या सामन्याच्यावेळी भारताची बाजू जास्त मजबूत असेल, असं मत दानिश कनेरियाने व्यक्त केलं.

केएल राहुलच्या फॉर्मवर नजर

पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने आणि 18 वनडे खेळणाऱ्या दानिश कनेरियाने इंडिया टुडेशी चर्चा केली. “मला झिम्बाब्वे सीरीज मध्ये केएल राहुलचा फॉर्म बघायचा आहे. कारण दुखापतीनंतर तो पुनरागमन करतोय. रोहित शर्मा बद्दलही प्रश्न आहे, कारण तो पाठिच्या दुखण्यातून सावरतोय. पाकिस्तानी संघात नसीम शाह आपल्या दुखापतीमुळे हैराण आहे. शाहीन शाह आफ्रिदीलाही फिटनेसची समस्या आहे. दोन्ही संघांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत” असं दानिश कनेरिया म्हणाले.

म्हणून भारताचं पारडं जड

“अजूनही भारताच पारड जड आहे. ते पुनरागमन करु शकतात. ते चांगलं टी 20 क्रिकेट खेळतायत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा सामना 60 टक्के भारताच्या बाजूने आहे, तर 40 टक्के पाकिस्तानची बाजू वरचढ आहे. भारताकडे शानदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा सारखे स्पिनर आहेत. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सारखे गोलंदाज टीम इंडियासाठी कमाल करु शकतात. पाकिस्तानला आपल्या गोलंदाजीकडे लक्ष द्यावे लागेल, कारण शाहीन फिट नसेल, तर मग पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व कोण करणार?” असा सवाल दानिश कनेरिया यांनी उपस्थित केला.

भारत-पाक मध्ये शेवटचा सामना कधी झाला?

याआधी भारत आणि पाकिस्तान मध्ये शेवटचा टी 20 सामना मागच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये झाला होता. ज्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पाकिस्तानने 10 विकेटने एकतर्फी विजय मिळवला होता. कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून झालेला भारताचा हा पहिला पराभव होता. टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक्त आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.