AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थ, भारताचा विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 237 धावा केल्या.

डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थ, भारताचा विजय
डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Oct 03, 2022 | 12:05 AM
Share

नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता.

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला.

मिलरचं शतक व्यर्थ

एका क्षणी मिलर आणि डी कॉक भारताकडून हा सामना हिसकावून घेतील असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 106 धावा केल्या. पण, भारताच्या विजयानं त्या व्यर्थ ठरल्या. डेव्हिड मिलरने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. मिलरने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले.

सर्वाधिक 106 धावा

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकातच संघाने दोन विकेट गमावल्या.

क्विंटन डी कॉक आणि मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली.मार्करामला अक्षर पटेलने क्लीन बोल्ड केले, त्याने 19 चेंडूत 33 धावा केल्या.

डी कॉक 48 चेंडूत 69 धावा करून नाबाद राहिला.डी कॉक आणि मिलरने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 37 धावांची गरज होती आणि मिलरने शेवटच्या षटकात अक्षर पटेलविरुद्ध दोन षटकार मारत शतक ठोकले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 237 धावा केल्या. रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली.

रोहित 37 चेंडूत 43 धावा करून बाद झाला.त्याचवेळी केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली.त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा