AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli vs Gautam Gambhir : भांडणामुळे गंभीरच इतक्या लाखांच, तर विराटच किती कोटीच नुकसान?

Virat Kohli vs Gautam Gambhir : विराट विरुद्ध गौतम वादात हरभजन कोणाच्या बाजूने बोलला? Watch Video. हरभजन सिंगने विराट कोहलीला एक सल्ला दिलाय.

Virat Kohli vs Gautam Gambhir : भांडणामुळे गंभीरच इतक्या लाखांच, तर विराटच किती कोटीच नुकसान?
IPL 2023 Virat kohli-Gautam Gambhir (1)Image Credit source: Twitter
| Updated on: May 02, 2023 | 2:37 PM
Share

नवी दिल्ली : विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी चर्चेच कारण त्याची फलंदाजी नाही, तर वाद आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध RCB ने मिळवलेल्या विजयानंतर विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहली या मॅचमध्ये LSG चा नवीन उल हक आणि गौतम गंभीरला भिडला. परिस्थिती इथपर्यंत आली की, अन्य़ खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळं केलं. दोघांवर कारवाई करण्यात आली असून 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. हरभजन सिंगने या मुद्यावर एक विधान केलय. हरभजन सिंग म्हणाला की, अशाच एका भांडणामुळे मला आजही लाज वाटते.

हरभजन सिंह आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय. 2008 साली हरभजन सिंग सुद्धा अशाच एका वादात अडकला होता. त्याने भांडण केलं होतं. ज्याची आजही हरभजनला लाज वाटते. हरभजनने त्यावेळी मॅचनंतर श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. श्रीसंतला मैदानातच रडू कोसळलं होतं. हरभजन सिंगला त्या सीजनमध्ये टुर्नामेंटमधून बाहेर करण्यात आलं होत.

हरभजन काय म्हणाला?

“हरभजन सिंगने आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलाय. विराट कोहली एक लीजेंड महान खेळाडू आहे. त्याने अशा विषयांमध्ये पडू नये. जे काही विराट आणि गंभीरमध्ये झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय” असं हरभजन सिंग आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला.

पैशामध्ये तिघांच किती नुकसान झालं?

या वादावादीमध्ये अडकलेल्या तिन्ही खेळाडूंना मोठा दंड ठोठावला. विराट कोहलीला एका मॅचमध्ये एक कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळते. त्याची पूर्ण मॅच फी कापली गेलीय. गौतम गंभीरच 25 लाखाच नुकसान झालय. तेच नवीन उल हकला 1.79 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. वादाची बीज 10 एप्रिलला रोवली गेली

लखनौ आणि बँगलोरमधील वादाची बीज 10 एप्रिलला रोवली गेली होती. त्या मॅचमध्ये लखनौने लास्ट बॉलवर आरसीबीला हरवलं होतं. त्यानंतर टीमचा मेंटॉर गौतम गंभीरने आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. गौतम गंभीरने तोंडावर बोट ठेवण्याची कृती केली होती. आरसीबीने लखनौला हरवल्यानंतर त्यांनी सुद्धा हेच काम केलं. या दरम्यान नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यात शाब्दीक वादावादी झाली.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.