AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो मोठा फटका

अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पराभव इंग्लंडच्या चांगलाच जिव्हारी लागला असून याचा फटका IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा मानहानीकारक पराभव झाला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो मोठा फटका
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 6:12 PM
Share

मुंबई: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पराभव इंग्लंडच्या चांगलाच जिव्हारी लागला असून याचा फटका IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा मानहानीकारक पराभव झाला. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England Cricket board) खेळाडूंवर काही बंधन घालण्याचा विचार करत आहे. भारत दौऱ्यात इंग्लंडचा पराभव झालाच, पण मायदेशातील मालिकेतही इंग्लंडचा संघ मागे पडलाय. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर लगाम लावण्याच्या विचारात आहे.

फटका कसा बसणार?

इंग्लिश क्रिकेटपटूंच्या IPL 2022 स्पर्धेत खेळण्यावर काही बंधन येऊ शकतात. आतापर्यंत इंग्लिश खेळाडू IPL चा संपूर्ण मोसम खेळण्यासाठी उपलब्ध असतात. पण आता असं होण कठीण दिसतय. कसोटी क्रिकेटच्या तयारीसाठी त्यांना एक ठराविक वेळेसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळू शकते.

हा प्रस्ताव स्वीकारणार?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाला कसोटीमध्ये आपल्या संघाचा खेळ सुधारण्यासाठी काही सल्ले मिळाले आहे. दी टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्याचाही सल्ला यामध्ये आहे. इंग्लिश टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाइल्स यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट कमिटीचे प्रमुख अँड्र्यू स्ट्रॉस यांना हे सल्ले दिले आहेत. पुढच्या मोसमात इंग्लिश संघाला कसोटीसाठी चांगली तयारी करता यावी, यासाठी हे सल्ले दिले आहेत.

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने आयपीएल बद्दल आलेल्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतला, तर त्याचा IPL 2022 स्पर्धेला फटका बसू शकतो. पण इंग्लंडच्या खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फ्रेंचायजींकडून घसघशीत रक्कम दिली जाते.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.