AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या ‘त्या’ दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग

त्या दोघांच नाव घेणं आधी बंद करा, गौतग गंभीरचा 'त्या' दोन स्टार खेळाडूंवर इतका राग का?

गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या 'त्या' दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग
Gautam-GambhirImage Credit source: instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 1:42 PM
Share

मुंबई: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर क्रिकेट संदर्भातील विषयांवर बेधडक, बिनधास्त मत व्यक्त करतो. गौतम गंभीरने मांडलेला विचार अनेकदा बातमीचा विषय बनतो. गौतम गंभीरने आता सुद्धा अशीच बेधडक मत मांडली आहेत. त्याने क्रिकेटमधील हिरो कल्चरवर बोट ठेवलं आहे. कुठल्या एका क्रिकेटरची पूजा करणं बंद करा, असं त्याने म्हटलं आहे.

मीडियाला दिला सल्ला

गौतम गंभीरने थेट मोठ्या खेळाडूंची नाव घेतली आहेत. आपण कपिल देव, विराट कोहली, एमएस धोनी यांची नाव सोडून फक्त टीमबद्दल बोललं पाहिजे. त्याने मीडियाला सुद्धा सल्ला दिला. मीडियाने फक्त एका खेळाडूवर नाही, तर टीमच्या अन्य खेळाडूंवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.

गौतमच्या गंभीर गोष्टी

आपण कुठल्या एका खेळाडूला मोठं करण्याऐवजी पूर्ण टीम कशी मोठी होईल? त्यावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला गंभीरने दिला. ज्या दिवशी विराट कोहलीने 71 वी सेंच्युरी मारली, त्याचदिवशी भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या होत्या. पण सगळे विराटबद्दलच बोलत होते.

मी एकाट होतो, जो त्या दिवशी….

“ज्या दिवशी विराटने सेंच्युरी मारली, त्याचदिवशी मेरठ सारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या भुवनेश्वर पाच विकेट घेतल्या. पण कोणी त्याबद्दल बोललं नाही. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कॉमेंट्री करताना मी सातत्याने भुवनेश्वरबद्दल बोलत होतो. भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. याबद्दल फार लोकांना माहित असेल, असं मला वाटत नाही” असं गंभीर म्हणाला.

‘या’ संस्कृतीमधून बाहेर पडाव लागेल

गौतम गंभीर इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात बोलत होता. विराटच्या शतकाचा संपूर्ण देशात जल्लोष सुरु होता. “भारताला एका हिरोच्या संस्कृतीमधून बाहेर पडावं लागेल. क्रिकेट असो किंवा राजकारण, आपण फक्त भारतीय क्रिकेटबद्दल बोललं पाहिजे” असं गौतम म्हणाला.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.