AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या ‘त्या’ दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग

त्या दोघांच नाव घेणं आधी बंद करा, गौतग गंभीरचा 'त्या' दोन स्टार खेळाडूंवर इतका राग का?

गौतम गंभीरने अखेर टीम इंडियाच्या 'त्या' दोन स्टार खेळाडूंवर काढला मनातला राग
Gautam-GambhirImage Credit source: instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 1:42 PM
Share

मुंबई: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर क्रिकेट संदर्भातील विषयांवर बेधडक, बिनधास्त मत व्यक्त करतो. गौतम गंभीरने मांडलेला विचार अनेकदा बातमीचा विषय बनतो. गौतम गंभीरने आता सुद्धा अशीच बेधडक मत मांडली आहेत. त्याने क्रिकेटमधील हिरो कल्चरवर बोट ठेवलं आहे. कुठल्या एका क्रिकेटरची पूजा करणं बंद करा, असं त्याने म्हटलं आहे.

मीडियाला दिला सल्ला

गौतम गंभीरने थेट मोठ्या खेळाडूंची नाव घेतली आहेत. आपण कपिल देव, विराट कोहली, एमएस धोनी यांची नाव सोडून फक्त टीमबद्दल बोललं पाहिजे. त्याने मीडियाला सुद्धा सल्ला दिला. मीडियाने फक्त एका खेळाडूवर नाही, तर टीमच्या अन्य खेळाडूंवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.

गौतमच्या गंभीर गोष्टी

आपण कुठल्या एका खेळाडूला मोठं करण्याऐवजी पूर्ण टीम कशी मोठी होईल? त्यावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला गंभीरने दिला. ज्या दिवशी विराट कोहलीने 71 वी सेंच्युरी मारली, त्याचदिवशी भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या होत्या. पण सगळे विराटबद्दलच बोलत होते.

मी एकाट होतो, जो त्या दिवशी….

“ज्या दिवशी विराटने सेंच्युरी मारली, त्याचदिवशी मेरठ सारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या भुवनेश्वर पाच विकेट घेतल्या. पण कोणी त्याबद्दल बोललं नाही. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कॉमेंट्री करताना मी सातत्याने भुवनेश्वरबद्दल बोलत होतो. भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. याबद्दल फार लोकांना माहित असेल, असं मला वाटत नाही” असं गंभीर म्हणाला.

‘या’ संस्कृतीमधून बाहेर पडाव लागेल

गौतम गंभीर इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात बोलत होता. विराटच्या शतकाचा संपूर्ण देशात जल्लोष सुरु होता. “भारताला एका हिरोच्या संस्कृतीमधून बाहेर पडावं लागेल. क्रिकेट असो किंवा राजकारण, आपण फक्त भारतीय क्रिकेटबद्दल बोललं पाहिजे” असं गौतम म्हणाला.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.