AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार! टीम इंडियाला अजून किती संधी? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 हे तिसरं पर्व आहे. आतापर्यंत कसोटीच्या दोन चॅम्पियनशिप पार पडल्या. दोन्ही वेळेस भारताच्या पदरी निराशा पडली. पहिल्यांदा न्यूझीलंड आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे भारत तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न पडला आहे.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचणार! टीम इंडियाला अजून किती संधी? जाणून घ्या
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया तिसऱ्यांदा धडक मारणार! कसं ते समजून घ्या
| Updated on: Dec 29, 2023 | 4:02 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामना आणि मालिकेला महत्त्वा प्राप्त झालं आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीत 9 संघ असून आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे. विजयी टक्केवारी अंतिम फेरीचं गणित अवलंबून आहे. भारत कसोटी चक्रातील दुसरी मालिका खेळत आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका 1-0 ने जिंकली होती. मालिकेतील एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. त्यामुळे विजयी टक्केवारीवर परिणाम झाला आहे. तसेच एकाच पराभवामुळे पहिल्या स्थानावर थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची रेस हवी तितकी सोपी नाही. त्यामुळे या पुढे होणाऱ्या मालिकेतील प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. इतकंच काय तर पेनल्टी लागू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा पेनल्टीच्या रुपाने विजयी टक्केवारीतील गुण उणे केले जातील. भारत आणि दक्षिण अफ्रिका मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना उरला आहे. हा सामना भारताने जिंकल्यास गुणांकनात फरक पडेल. तसेच दुसऱ्या स्थानी झेप घेता येईल. पण हा सामना गमावला तर थेट सातव्या किंवा आठव्या स्थानी घसरण होईल.

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत अजून चार मालिका खेळणार आहे. यात इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. यापैकी तीन मालिका भारतात होणार आहेत. तर एक मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. जानेवारी-मार्च 2024 दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. सप्टेंबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका, ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळली जाणार आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर 2024 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे.

भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्यांदा न्यूझीलंड आणि दुसऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. न्यूझीलंडने 8 गडी राखून भारताचा पराभव केला होता. तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे दोन वेळेस भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा भारत अंतिम फेरी गाठतो का? हा प्रश्न आहे.

Follow Us
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा