AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Toss : पाकिस्तानने दुबईत निर्णायक टॉस जिंकूनही माती खाल्ली, टीम इंडियाविरुद्ध निर्णय काय?

Icc Champions Trophy 2025 Pakistan vs India Toss : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. या सामन्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी दुबईतील आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थितीती लावली आहे.

IND vs PAK Toss : पाकिस्तानने दुबईत निर्णायक टॉस जिंकूनही माती खाल्ली,  टीम इंडियाविरुद्ध निर्णय काय?
ind vs pak ct 2025 toss
| Updated on: Feb 23, 2025 | 2:21 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील सामना होणार आहे. या ए ग्रुपमधील सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 2 वाजता टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मोहम्मद रिझवान याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

मोहम्मद रिझवानची घोडचूक!

खरं तर रिझवानने या सामन्यात निर्णायक असा टॉस जिंकला. मात्र त्यानंतरही रिझवानने घोडचूक केली, असं तु्म्हीही दुबईतील आकडेवारी पाहून म्हणाल. दुबईत 2023 पासून एकूण 14 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या 14 पैकी 10 सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर फक्त 4 वेळाच पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकता आलं आहे. त्यामुळे रिझवानने टॉस जिंकून मोठी संधी गमावली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता टीम इंडिया या संधीचा कितपत फायदा घेत पाकिस्तानला किती धावांवर रोखते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दुबईत टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा?

दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दुबईत टॉस फॅक्टर निर्णायक ठरला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

टीम इंडिया अनचेंज, पाकिस्तामध्ये 1 बदल

दरम्यान महामुकाबल्यासाठी कर्णधार रोहित शर्मा याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बांगलादेशविरुद्ध खेळलेले तेच खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहेत. तर पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. दुखापतग्रस्त ओपनर फखर जमान याच्या जागी इमाम उल हक याचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाची पहिले फिल्डिंग

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.