मुंबई : भारतीय संघ बहुप्रतिक्षीत टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) संपूर्णपणे सज्ज झाला आहे. फक्त आता नेमकं कोणत्या खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळतं? हे पाहावं लागणार आहे. दरम्यान InsideSport.co यांच्या रिपोर्टनुसार भारतीय संघाची निवड झाली असून केवळ घोषणा करणं बाकी आहे. विशेष म्हणजे InsideSport ला ही माहिती BCCI च्या एका उच्च अधिकारी आणि निवड समितीच्या सदस्याकडून मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निवडकर्त्यांनी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करुन संघ निवडला आहे. तसेच आज (6 सप्टेंबर) किंवा उद्या अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
याआधी समोर आलेल्या माहितीनुसार BCCI च्या सूत्रांनी सांगितले होते की, टी-20 विश्वचषकासाठीच्या संघाची निवड भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओवलमधील चौथ्या कसोटीनंतर होणार आहे. आज या कसोटीचा शेवटचा दिवस असून आजच या विश्वचषकासाठीच्या अंतिम 15 खेळाडूंची घोषणा आज होऊ शकते.
टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे असून रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे. पण शिखर धवन, पृथ्वी शॉ, मोहम्मद शमी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याच्या निवडीवरही सगळ्यांचे लक्ष असेल. तसंच अष्टपैलू हार्दीक पंड्यालाही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्याची निवड होईल की नाही? हा प्रश्नही कायम आहे. पंड्याला सध्या शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे तगडे पर्याय उपलब्ध आहेत.
केएल राहुल, रोहित शर्मा (उप-कर्णधार),विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, शिखर धवन
राखीव: वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, पृथ्वी शॉ, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा
संबंधित बातम्या
(ICC t20 world cup 2021 indian team selection will hel today on 6th september says reports)