INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?

India vs Pakistan Womens 1st Innings Highlights : टीम इंडियाने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारतासाठी स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी मोठी भागीदारी केली.

INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?
Smriti Mandhana and Richa Ghosh
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 14, 2026 | 9:39 PM

सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या लागणार आहेत. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 170 रन्स केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी सलामी देणार की पाकिस्तान मैदान मारणार? हे काही वेळातच स्पष्ट होईल.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाची सलामी जोडी अपेक्षित सुरुवात मिळवून देण्यात अपयशी ठरली. शफाली वर्मा 6 धावांवर आऊट झाली. तर जेमिमाह रॉड्रिग्स हीने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाची 3.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 अशी स्थिती झाली.

स्मृती मंधाना -हरमनप्रीत कौरची विक्रमी भागीदारी

त्यानंतर ओपनर स्मृती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या जोडीने पाकिस्तान विरुद्ध टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. या दोघींनी 91 धावांची भागीदारी केली. या दरम्यान स्मृतीने अर्धशतक झळकावलं. मात्र स्मृतीला अर्धशतकानंतर 18 धावाच जोडता आल्या. स्मृतीने 44 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 68 रन्स केल्या. त्यानंतर भारती फुलमाळी हीने निराशा केली. भारती 1 धाव करुन आऊट झाली. हरमनप्रीत कौर हीला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र हरमनप्रीत निर्णायक क्षणी आऊट झाली. हरमनप्रीतने 35 बॉलमध्ये 36 रन्स केल्या.

टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा

ऋचा घोषचा फिनिशिंग टच, 200 च्या स्ट्राईक रेटने धावा

त्यानंतर ऋचा घोष हीने दीप्ती शर्मा हीच्यासह फटकेबाजी केली. ऋचाने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 170 हा आकडा गाठता आला. ऋचाने 200 च्या स्ट्राईक रेटने 17 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. ऋचाने या खेळीत 1 सिक्ससह 5 चौकार लगावले. तर दीप्ती शर्मा (12)* आणि श्रेयांका पाटील (1)* धावा करुन नाबाद परतल्या. पाकिस्तानसाठी सादीया इक्बाल आणि कॅप्टन फातिमान सना या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us