AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विराट आणि मी सोडलो तर…’,10 विकेट्सच्या पराभवानंतर रोहित शर्मा याने कोणाला पकडलं जबाबदार!

एकट्या स्टार्क याने 5 विकेट्स घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करून टाकली. प्रमुख फलंदाजांनीही स्टार्कसमोर अक्षरक्ष: लोटांगण घातलं. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया देताना परभवाचं कारण सांगितलं आहे.

'विराट आणि मी सोडलो तर...',10 विकेट्सच्या पराभवानंतर रोहित शर्मा याने कोणाला पकडलं जबाबदार!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 19, 2023 | 11:25 PM
Share

मुंंबई : ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 10 गडी राखून पराभव केला. आजच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो मिचेल स्टार्क. एकट्या स्टार्क याने 5 विकेट्स घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करून टाकली. प्रमुख फलंदाजांनीही स्टार्कसमोर अक्षरक्ष: लोटांगण घातलं. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया देताना परभवाचं कारण सांगितलं आहे.

सामना गमावल्यानंतर निराशा येतेच, सामन्यामध्ये फलंदाज कमी पडले कारण ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती. आम्ही धावा काढण्यामध्ये अपयशी ठरलोत आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी धावा काढण्याची संधीही दिली नाही. शुबमन बाद झाल्यानंतर विराट आणि मी 30 ते 35 धावा केल्या होत्या मात्र त्यानंतर माझी विकेट गमावली आणि पुढे मोठी भागीदारी झाली नसल्याचं, असं रोहित शर्मा म्हणाला. स्टार्क एक उत्तम गोलंदाज आहे. नव्या चेंडूने तो घातक गोलंदाजी करतो त्याच्यासमोर आम्ही अपयशी ठरलो असून आता आम्ही हे सर्व समजून घेऊन त्यानुसार खेळ करणार असल्याचंही रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला. या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेल मार्श याने नाबाद 66 आणि ट्रेव्हिस हेड याने नाबाद 51 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

दरम्यान आता 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम मालिका जिंकेल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार