AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : चौथा कसोटी सामना फिक्स होता? विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटच्या एका वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

IND vs AUS : चौथा कसोटी सामना फिक्स होता? विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ
| Updated on: Mar 13, 2023 | 10:36 PM
Share

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराट कोहलीने या सामन्यात पहिल्या डावामध्ये 186 धावांची दमदार खेळी केली. कोहली आणि गिल यांच्या मोठ्या खेळीमुळे सामना ड्रॉ राहिला नाहीतर निकाल बदलू शकला असता. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये अंतिम फेरी गाठायची होती. मात्र दुसरीकडे किवींनी लंकेचा पराभव करत भारताला फायनलचं तिकीट मिळवून दिलं. सामना झाल्यावर विराटने गेमप्लॅन कुठे बदलला याबाबत खुलासा केला आहे. विराटच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

आम्ही तिसऱ्या दिवशीही पॉझिटिव्ह माईंडसेटनेच खेळत होतो मात्र श्रेयस अय्यर बॅटींग करू शकणार नाही हे समजल्यावर गेमप्लॅन बदलला. आम्ही ऑस्ट्रेलियाला जास्त वेळ मैदानावरच फिल्डिंगसाठी ठेवलं आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती, असं विराट कोहलीने सांगितलं. एकंदरित विराटच्या बोलण्यावरून श्रेयस मैदानात फलंदाजीसाठी आला असता तर आक्रमक पवित्रा घेत मोठी धावसंख्या उभारत कांगारूंना दुसऱ्या डावासाठी बोलावत त्यांना लवकर गुंडाळून सामना जिंकायचा असा टीम इंडियाचा इरादा होता. मात्र असं काही झालं नाही कारण अय्यर मैदानात उतरूच शकला नाही.

विराटच्या सांगण्यावरून भारताने जास्त वेळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सामना ड्रा करण्यात कामी आला. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना गमवायचा नव्हता. त्यामुळे टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी सामना ड्रॉ करायचा हेच फिक्स केलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

विराटचं टीकाकारांना उत्तर-

माझ्या स्वतःच्या अपेक्षा माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. मी आधी मोठ्या खेळी खेळल्या आहेत. चांगल्या खेळपट्टीवर मी मोठी धावसंख्या करू शकेन, असा विश्वास मला होता होता. मी माझ्या पद्धतीने खेळलोय. मला वाटत नाही की मी कोणाला चुकीचे सिद्ध करावं, असं म्हणत विराटने मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.