AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : “तेव्हा टीम मॅनेजमेंटने…”, संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच

Sanju Samson IND vs BAN 3rd T20i : संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर सडकून टीका गेली. मात्र संजूने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात झंझावाती 111 धावांची शतकी खेळी केली.

IND vs BAN : तेव्हा टीम मॅनेजमेंटने..., संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच
sanju samsonImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2024 | 2:57 AM
Share

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी20I सामन्यात 133 धावांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. संजूने 40 चेंडूत शतकी खेळी केली. संजू टीम इंडियाकडून टी20I मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने एकूण 111 धावांची खेळी केली. संजूने या खेळीत एकाच षटकात सलग 5 सिक्स खेचले. संजूच्या या खेळीसह इंडिया टी 20I क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक 297 धावा करणारी कसोटी क्रिकेट खेळणारी टीम ठरली. संजू आणि सूर्यकुमार या दोघांनी केलेल्या भागीदारीची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या विजयानंतर संजू सॅमसन याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजू या विजयानंतर भरभरून बोलला. ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि सहकारी खेळाडू माझ्यासाठी फार आनंदी असल्याचं संजूने म्हटलं. मी यापेक्षा आणखी चांगली कामगिरी करु शकलो असतो, असं सूर्याने म्हटलं.

संजू काय म्हणाला?

“मला या मैदानात खेळण्याचा फार अनुभव आहे. दबावात आणि अपयशाचा सामना कसा करायचा हे मला माहित आहे. देशासाठी खेळताना तुमच्यावर दडपण असतं. ते दडपण होतं, मात्र मला खेळायचं होतं. आपल्याला बेसिकवर लक्ष द्यायचंय याची मी स्वत:ला सातत्याने आठवण करुन देत होतो. मी गेल्या मालिकेत 2 वेळा शून्यावर बाद झालो. तेव्हा टीम मॅनेजमेंटने मला पाठिंबा दिला”, असं संजूने सांगितलं.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने विक्रमी 297 धावा केल्या. संजूने सर्वाधिक 111 तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 75 धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्याने 47 धावांची खेळी केली. बांगलादेशला प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 164 रन्सच करता आल्या. बांगलादेशकडून तॉहिद हृदॉयने 63 तर लिटन दासनने 42 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन