AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : “तेव्हा टीम मॅनेजमेंटने…”, संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच

Sanju Samson IND vs BAN 3rd T20i : संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर सडकून टीका गेली. मात्र संजूने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात झंझावाती 111 धावांची शतकी खेळी केली.

IND vs BAN : तेव्हा टीम मॅनेजमेंटने..., संजू सॅमसनने अखेर बोलून दाखवलंच
sanju samsonImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 13, 2024 | 2:57 AM
Share

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी20I सामन्यात 133 धावांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. संजूने 40 चेंडूत शतकी खेळी केली. संजू टीम इंडियाकडून टी20I मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने एकूण 111 धावांची खेळी केली. संजूने या खेळीत एकाच षटकात सलग 5 सिक्स खेचले. संजूच्या या खेळीसह इंडिया टी 20I क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक 297 धावा करणारी कसोटी क्रिकेट खेळणारी टीम ठरली. संजू आणि सूर्यकुमार या दोघांनी केलेल्या भागीदारीची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या विजयानंतर संजू सॅमसन याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजू या विजयानंतर भरभरून बोलला. ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि सहकारी खेळाडू माझ्यासाठी फार आनंदी असल्याचं संजूने म्हटलं. मी यापेक्षा आणखी चांगली कामगिरी करु शकलो असतो, असं सूर्याने म्हटलं.

संजू काय म्हणाला?

“मला या मैदानात खेळण्याचा फार अनुभव आहे. दबावात आणि अपयशाचा सामना कसा करायचा हे मला माहित आहे. देशासाठी खेळताना तुमच्यावर दडपण असतं. ते दडपण होतं, मात्र मला खेळायचं होतं. आपल्याला बेसिकवर लक्ष द्यायचंय याची मी स्वत:ला सातत्याने आठवण करुन देत होतो. मी गेल्या मालिकेत 2 वेळा शून्यावर बाद झालो. तेव्हा टीम मॅनेजमेंटने मला पाठिंबा दिला”, असं संजूने सांगितलं.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने विक्रमी 297 धावा केल्या. संजूने सर्वाधिक 111 तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 75 धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्याने 47 धावांची खेळी केली. बांगलादेशला प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 164 रन्सच करता आल्या. बांगलादेशकडून तॉहिद हृदॉयने 63 तर लिटन दासनने 42 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.