AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul: कॅच सोडून पण केएल राहुलच विकेटकीपर रहाणार असेल, मग त्या तिघांच काय? हा अन्याय नाही का?

वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून टीम इंडियाने बदलली रणनिती

KL Rahul: कॅच सोडून पण केएल राहुलच विकेटकीपर रहाणार असेल, मग त्या तिघांच काय? हा अन्याय नाही का?
केएल राहुलImage Credit source: social
| Updated on: Dec 05, 2022 | 1:27 PM
Share

ढाका: पुढचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 2023 वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट भारतात रंगणार आहे. टीम इंडियाने आतापासून या वर्ल्ड कपसाठी तयारी सुरु केली आहे. संघबांधणी त्या दृष्टीने होणार आहे. पुढची वर्ल्ड कप स्पर्धा इशान किशन, संजू सॅमसन आणि ऋषभ पंतला कदाचित घरी बसून पहावी लागेल. उपकर्णधार केएल राहुलनेच तसे संकेत दिलेत. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळेल.

या सामन्यात महत्त्वाची कॅच सोडली

त्यामुळे इशान, सॅमसन आणि पंतला संधी मिळण्याची शक्यता फार कमी दिसतेय. काल बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडेत इशान किशन बेंचवर बसून होता. त्यावेळी राहुलकडे विकेटकीपिंगची जबाबदारी होती. राहुलने या सामन्यात महत्त्वाची कॅच सोडली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

पंतला का रिलीज केलं?

“मागच्या 6-7 महिन्यापासून आम्ही फार वनडे सामने खेळले नाहीयत. पण तुम्ही 2020-21 मध्ये पाहिलत, तर मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळली आहे. टीमनेच मला ही जबाबदारी दिली आहे. पंतला का रिलीज केलं? ते कारण मला समजलेलं नाही. मेडीकल टीमच त्याबद्दल सांगू शकेल” असं केएल राहुल पत्रकार परिषदेनंतर म्हणाला.

….तरच दुसऱ्या विकेटकिपर्सना संधी

राहुल याच भूमिकेत राहिला, तर उर्वरित तीन योग्य विकेटकीपर्सना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. टीम मॅनेजमेंट सूर्यकुमार यादवच्या समावेशाबद्दल गंभीर आहे. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल, तर संजू सॅमसन, इशान किशन आणि ऋषभ पंत बॅकअप विकेटकीपर्सच्या भूमिकेत राहतील. केएल राहुलला दुखापत झाली, तरच त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.

भारताला मोठी किंमत चुकवावी लागली

काल बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात केएल राहुलने शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या 43 व्या षटकात मेहदी हसन मिराजची महत्त्वाची कॅच सोडली. याच मिराजने नाबाद 38 धावांची खेळी करुन भारताला विजयापासून दूर ठेवलं. बांग्लादेशची शेवटची जोडी मैदानात होती, राहुलने कॅच घेतली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....