Ajaz Patel | मुंबईत जन्म, न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध मैदानात, एजाज पटेलने वानखेडेवरच टीम इंडियाला लोळवलं

| Updated on: Dec 04, 2021 | 1:36 PM

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

Ajaz Patel | मुंबईत जन्म, न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध मैदानात, एजाज पटेलने वानखेडेवरच टीम इंडियाला लोळवलं
Ajaz Patel
Follow us on

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 221 धावा केल्या होत्या. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाजचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं. (IND vs NZ, Mumbai Test: Ajaz Patel become Third Bowler in History to Claim 10 Wickets in an Innings)

दरम्यान, भारताचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. मयंक आणि अक्षरव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. काल सलामीवीर शुभमन गिलने 44 धावांचं योगदान दिलं होतं. दरम्यान, भारताचे 3 फलंदाज भोपळ्यावर परतले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या तिघांचा समावेश आहे.

एजाज पटेलचे 10 बळी

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी ही कामगिरी केली आहे. हे काम जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याचवेळी कांबुळेने हा विक्रम फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला होता. एजाजने या डावात 47.5 षटकं गोलंदाजी केली. यापैकी 12 षटकं त्याने निर्धाव टाकली आणि 119 धावा देत 10 बळी घेतले.

मुंबईत जन्म

एजाजला मुंबईबद्दल एक वेगळीच ओढ असल्याचे दिसते. त्यांचा जन्मही याच शहरात झाला आहे. एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईतच झाला होता. तो आठ वर्षांचां असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते या देशातील रहिवासी आहेत. आता भारताला त्याच्या जन्मभूमीवर हरवण्याचा निर्धार त्याने केला आहे, असे दिसतेय.

घरच्या मैदानावर विकेटचा दुष्काळ

एजाजच्या कारकिर्दीतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला न्यूझीलंडमध्ये विकेट्सचं खातंदेखील उघडता आलेलं नाही. न्यूझीलंडमध्ये हा खेळाडू आतापर्यंत तीन सामने खेळला असून तीनही सामन्यांमध्ये त्याला विकेट घेता आलेली नाही. मात्र देशाबाहेर त्याने त्याचा जलवा दाखवला आहे. एजाज उपखंडात खूप यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

इतर बातम्या

कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित

Ajinkya Rahane | खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, दोन खेळाडू शर्यतीत

IND vs NZ | विराट कोहली पुन्हा 0 वर बाद, अंपायरच्या निर्णयावर सवाल उपस्थित

(IND vs NZ, Mumbai Test: Ajaz Patel become Third Bowler in History to Claim 10 Wickets in an Innings)