AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : या तारखा आजच नोट करा; राज्यात अतिवृष्टी, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आता या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा पाऊस अंदाज समोर आला आहे.

Monsoon Update : या तारखा आजच नोट करा; राज्यात अतिवृष्टी, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
राज्यात अतिवृष्टीचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 9:26 PM
Share

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना नवा हवामान अंदाज देखील समोर आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा 

‘आठ जूनपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही, पावसापासून वंचित आहे, त्या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नंदूरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जालना या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर उर्वरीत जे जिल्हे आहेत, सातारा जिल्हा,सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव, जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिगोंली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्यानंतर वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

दरम्यान एकीकडे यंदा पावसावर अल् निनोचं सावट असल्यामुळे पाऊस कमी होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे मात्र राज्यात परतीचा पाऊस जोरात होईल, त्यामुळे दोन्ही खरीप आणि रब्बी हंगाम चांगले येतील, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, असा दावा पंजाबराव डख यांनी केला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला