AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 10, 2022 | 7:02 AM
Share

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना 28 ऑगस्टला होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट प्रेमींची नजर असेल. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात.

IND vs PAK: 28 ऑगस्टला पहिला सामना

आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टला सुरु होऊन 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघात होईल. दुसऱ्यादिवशी 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येतील.

IND vs PAK: 4 सप्टेंबरला होऊ शकतो दुसरा सामना

28 ऑगस्टला पहिला सामना होईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला सुपर फोर राऊंड मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येऊ शकतात. कारण भारत-पाकिस्तान दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. हे दोन्ही संघ ग्रुप मध्ये टॉपवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यात सामना होईल.

IND vs PAK: 11 सप्टेंबरला फायनल मध्ये होऊ शकतो आमना-सामना

आशिया कपच्या फायनल मध्ये हे दोन संघ पोहोचू शकतात. फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येऊ शकतात. आशियातील हे दोन्ही बलाढ्य संघ असून दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.

कुठे आणि किती वाजता होणार सामने?

भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप मध्ये तीन सामने झाले, तर त्या मॅच कुठे होतील?. यावेळी आशिया कपचे दुबई मध्ये आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता हे तिन्ही सामने सुरु होतील.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.