AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 10, 2022 | 7:02 AM
Share

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना 28 ऑगस्टला होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट प्रेमींची नजर असेल. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात.

IND vs PAK: 28 ऑगस्टला पहिला सामना

आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टला सुरु होऊन 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघात होईल. दुसऱ्यादिवशी 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येतील.

IND vs PAK: 4 सप्टेंबरला होऊ शकतो दुसरा सामना

28 ऑगस्टला पहिला सामना होईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला सुपर फोर राऊंड मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येऊ शकतात. कारण भारत-पाकिस्तान दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. हे दोन्ही संघ ग्रुप मध्ये टॉपवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यात सामना होईल.

IND vs PAK: 11 सप्टेंबरला फायनल मध्ये होऊ शकतो आमना-सामना

आशिया कपच्या फायनल मध्ये हे दोन संघ पोहोचू शकतात. फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येऊ शकतात. आशियातील हे दोन्ही बलाढ्य संघ असून दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.

कुठे आणि किती वाजता होणार सामने?

भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप मध्ये तीन सामने झाले, तर त्या मॅच कुठे होतील?. यावेळी आशिया कपचे दुबई मध्ये आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता हे तिन्ही सामने सुरु होतील.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार