AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल.

Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 10, 2022 | 7:02 AM
Share

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना 28 ऑगस्टला होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट प्रेमींची नजर असेल. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात.

IND vs PAK: 28 ऑगस्टला पहिला सामना

आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टला सुरु होऊन 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघात होईल. दुसऱ्यादिवशी 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येतील.

IND vs PAK: 4 सप्टेंबरला होऊ शकतो दुसरा सामना

28 ऑगस्टला पहिला सामना होईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला सुपर फोर राऊंड मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येऊ शकतात. कारण भारत-पाकिस्तान दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. हे दोन्ही संघ ग्रुप मध्ये टॉपवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यात सामना होईल.

IND vs PAK: 11 सप्टेंबरला फायनल मध्ये होऊ शकतो आमना-सामना

आशिया कपच्या फायनल मध्ये हे दोन संघ पोहोचू शकतात. फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येऊ शकतात. आशियातील हे दोन्ही बलाढ्य संघ असून दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.

कुठे आणि किती वाजता होणार सामने?

भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप मध्ये तीन सामने झाले, तर त्या मॅच कुठे होतील?. यावेळी आशिया कपचे दुबई मध्ये आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता हे तिन्ही सामने सुरु होतील.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.