AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st T20: टीम इंडिया जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

IND vs SA 1st T20: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

IND vs SA 1st T20: टीम इंडिया जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारणं
team india win
| Updated on: Sep 28, 2022 | 10:24 PM
Share

मुंबई: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिला सामना झाला. टीम इंडियाने या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाने मागच्या काही सामन्यात झालेल्या चुका सुधारल्याच दिसून आलं. खासकरुन गोलंदाजीमध्ये.

दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 107 धावांच लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 20 चेंडू राखून आरामात हे लक्ष्य पार केलं. केएल राहुल नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावांची खेळी केली.

आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने कसा विजय मिळवला. त्यामागची काय कारणं आहेत, ते समजून घेऊया.

– टीम इंडियाच्या आजच्या विजयाचं श्रेय जात गोलंदाजांना. गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवलं. त्यातून शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेची टीम बाहेर येऊ शकली नाही. अचूक टप्पा आणि स्विंगचा फायदा उचलून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीच कबंरड मोडलं.

– अर्शदीप सिंहने टीमच्या दुसऱ्या आणि व्यक्तीगत पहिल्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. क्विंटन डि कॉक, रिली रुसो आणि डेविड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या प्लेयर्सला त्याने तंबूत पाठवलं. रुसो आणि मिलरला अर्शदीपने खातही उघडू दिलं नाही. 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देऊन तीन विकेट काढल्या.

– दीपक चाहरने पहिल्या ओव्हरपासून टीम इंडियाला यश मिळवून दिलं. त्याने कॅप्टन टेंबा बावुमाला शुन्यावर बोल्ड केलं. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केलं. त्याने दोन्ही फलंदाजंना शुन्यावर बाद केलं.

– तीन ओव्हर्समध्येच दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 9 अशी स्थिती होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मोठी भागीदारी होणार नाही याची भारतीय गोलंदाजांनी काळजी घेतली. मार्कराम आणि पार्नेलची जोडी हर्षल पटेलने फोडली. अश्विनने विकेट काढली नाही. पण टिच्चून मारा केला. चार ओव्हर्समध्ये त्याने एक मेडन ओव्हरसह फक्त 8 धावा दिल्या.

– टीम इंडियाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. कॅप्टन रोहित शर्मा 0 आणि विराट कोहली 3 धावांवर आऊट झाला. त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमारने जबाबदारी खेळ केला. त्यांनी आणखी पडझड होऊ न देताना टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केएल राहुलला सूर गवसला ही टीमसाठी चांगली बाब आहे. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.