AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारताने पराभूत करताच दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराने खरं काय ते सांगितलं

चार सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने दक्षिण अफ्रिकेला 61 धावांनी पराभूत केलं. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच सलग 11वा टी20 सामना जिंकला आहे. या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम चांगलाच संतापला आहे.

IND vs SA : भारताने पराभूत करताच दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराने खरं काय ते सांगितलं
| Updated on: Nov 09, 2024 | 5:09 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण संजू सॅमसनने शतकी खेळीसह दक्षिण अफ्रिकेचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने 8 गडी गमवून 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्व गडीबाद 141 धावा करू शकला. नाणेफेक जिंकल्यानंतर एडन मार्करमने गोलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असं मत क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याचं मात्र वेगळंच मत आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय चुकला का? या प्रश्नावर एडन मार्करम याने सांगितलं की, ‘नाणेफेकीचा कौलचा याचाशी काही संबंध नव्हता.दोन्ही नव्या चेंडूंसोबत अतिरिक्त उसळी मिळत होती. दोन्ही डावात असंच होतं. एकदा का नवा चेंडू जुना झाला की खेळ सोपा होतो. आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाहीत. हेच आमच्या पराभवाचं कारण आहे.’ भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिका कमबॅकसाठी प्रयत्नशील असेल. आता मालिकेत बरोबरी साधली जाते की आघाडी घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“संजू सॅमसन खरंच खूप छान खेळला. आमच्या गोलंदाजांना दबावात ठेवलं. त्याने इतकी जबरदस्त खेली की त्याला रोखणं कठीण गेलं.” असंही मार्करमने पुढे सांगितलं. ‘डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसोबत आमची बैठक झाली होती. गेराल्ड कोएत्झी आणि मार्को यानसेनने चांगली गोलंदाजी केली. आमचा पराभव झाला असला तरी आमच्यासाठी ही सकारात्मक बाब आहे.’, असंही मार्करमने पुढे सांगितलं. भारताने टी20 क्रिकेटमधील हा सलग 11 वा विजय होता. झिम्बाब्वे दौऱ्यात पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. त्या मालिकेतील 4 सामने सलग जिंकले. तर श्रीलंका आणि बांगलादेशला तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला. आता दक्षिण अफ्रिकेला पहिल्या सामन्यात पराभूत केलं.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना