AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विराट कोहलीने बेल्सवर पुन्हा एकदा जादूटोणा केल्याने मार्करम घाबरला! पंचांना घ्यावी लागली दखल

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशीच लागेल अशी स्थिती आहे. कारण पहिल्या दिवशी 23 गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या लंचपर्यंत दक्षिण अफ्रिकेचा डाव 176 आटोपला आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

Video : विराट कोहलीने बेल्सवर पुन्हा एकदा जादूटोणा केल्याने मार्करम घाबरला! पंचांना घ्यावी लागली दखल
IND vs SA : विराट कोहलीने दुसऱ्यांदा बेल्ससोबत केलं तसंच, मार्करमला घाम फुटल्याने पंचांनी घेतली धाव
| Updated on: Jan 04, 2024 | 3:36 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्याची भारताला सर्वाधिक संधी आहे. खेळपट्टी फलंदाजीला पूरक नसली तरी विजयासाठी दिलेल्या धावा नाममात्र आहेत. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला होता. त्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 153 धावा करत 98 धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मोडीत काढत आता दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 78 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण अफ्रिकेकडून दुसऱ्या डावात एडन मार्करम वगळता कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. एक एक करत मैदानात हजेरी लावून परतत होते. एडन मार्करमने 103 चेंडूत 106 धावांची खेळी केली. पण एडन मार्करमची फलंदाजी पाहून विराट कोहलीने जुना टोटका वापरला. त्यामुळे मार्करमला काही अंशी घाम फुटला. कारण पहिल्या कसोटीत जेव्हा असं केलं होतं तेव्हा दोन चेंडूनंतर विकेट गेली होती.

षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर एडन मार्करमने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर शेवटच्या चेंडूआधी विराट कोहली स्टंपजवळ गेला आणि त्याने बेल्स बदलल्या. विराट कोहलीची ही कृती पाहून मार्करम संतापलेला दिसला. पंचांनी विराट कोहलीला या कृतीसाठी दम भरला. पहिल्या कसोटीत जेव्हा डीन एल्गर आणि डी जॉर्जी ही भागीदारी तुटता तुटत नव्हती तेव्हा विराटने हा टोटका वापरला होता. दोन चेंडूनंतर विकेट मिळाली होती. त्यामुळे मार्करम संतापलेला दिसला होता. पण शेवटच्या चेंडूवर त्याला बॉल डिफेंड केला आणि स्वत:ला वाचवलं.

भारतासमोर विजयासाठी आता 79 धावांचं आव्हान आहे. पण हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत 7 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सावधपणे फलंदाजी करत विजयी धावा गाठव्या लागतील. अन्यथा हा विजय सुद्धा कठीण होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.