AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याच टीमला जमलं नाही, ते टीम इंडियाने करुन दाखवलंय. टीम इंडिया वनडे क्रिकेट इतिहासात 317 धावांनी विजयी ठरली आहे.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
| Updated on: Jan 16, 2023 | 3:03 AM
Share

तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाने नववर्षाची एकदम शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने रविवारी 15 जानेवारीला श्रीलंकेचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 317 धावांनी मोठ्ठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3-0 च्या फरकाने श्रीलंकेला क्लिन स्वीप केला. टीम इंडियाने या विजयासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याच टीमला जमलं नाही, ते टीम इंडियाने करुन दाखवलंय.

टीम इंडियाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात 317 धावांनी विजयी ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. आतापर्यंत वनडे क्रिकेटमधील मोठ्या विजयाचा रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या नावावर होता. न्यूझीलंडने आयर्लंडवर 290 धावांनी विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 275 धावांनी पराभूत केलं होतं. मात्र या संघांनी इतक्या मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी 400 पेक्षा अधिक धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघांना दिलं होतं. मात्र टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 391 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाच एकमेव अशी आहे जिने 300 पेक्षा अधिक धावांच्या अंतराने सामना जिंकला आहे. येत्या काळात हा रेकॉर्ड कदाचित ब्रेक होईल.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. निर्धारित 50 ओव्हरमध्ये 390 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक नाबाद 166 धावांची खेळी केली. तर त्या खालोखाल शुबमन गिलने 116 धावांची शतकी खेळी केली. या दोघांशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 43 धावा जोडल्या. तर श्रेयस अय्यरने 38 धावांचं योगदान दिलं.

भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करायचा या उद्देशाने श्रीलंका मैदानात उतरली. मात्र विजयासाठी 391 धावांचा डोंगर श्रीलंकेला सर करायचा होता. सामन्यात टीम इंडियाला झुंज द्यायचं राहिलं बाजूला. सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकूही दिलं नाही.

श्रीलंकेचा डाव 73 धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर श्रीलंकेचा शेवटच्या फलंदाज बॅटिंगसाठी आला नाही. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

विराट सामानावीर आणि मालिकावीर

दरम्यान विराट कोहलीने 166 धावांची खेळी केली. त्यामुळे विराटला मॅन ऑफ द मॅच ठरवण्यात आलं. तसेच विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यातही शतक ठोकलं होतं ,अशा प्रकारे विराटने या मालिकेत 2 शतक केले. त्याच्या या कामिगरीसाठी विराटला मालिकावीर घोषित करण्यात आलं.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड