AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : भारत श्रीलंका दुसरा वनडे सामना होणार की नाही? या बातमीने क्रीडाप्रेमींचं वाढलं टेन्शन

भारत आणि श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. मालिकेतील आघाडीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना दुसरा वनडे सामना होणार की नाही? याबाबत शंका आहे. नेमकं काय आणि कशासाठी ते जाणून घ्या

IND vs SL : भारत श्रीलंका दुसरा वनडे सामना होणार की नाही? या बातमीने क्रीडाप्रेमींचं वाढलं टेन्शन
| Updated on: Aug 03, 2024 | 10:36 PM
Share

भारत श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी म्हणजेच 4 ऑगस्टला होणार आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. याच मैदानावर झालेला पहिला सामना ड्रॉ झाला होता. आता दुसऱ्या सामन्यात काय निकाल लागतो आणि कोण आघाडी घेते याची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दडपण असणार आहे. पण हा सामना होईल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. पहिल्या सामन्यातही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र हा सामना निर्विघ्नपणे पार पडला. तसाच रविवारी पाऊस पडणार नाही, अशी आशा क्रीडारसिकांना आहे. पण यावेळी पावसाची शक्यता जास्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी करण्याची किंवा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते.

अॅक्युवेदरनुसार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 73 टक्के, तर संध्याकाळी 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान 28 ते 30 अंश असेल. तर हवामानाती आर्द्रता 80 टक्के असेल. दुसरीकडे, खेळपट्टीबाबत सांगायचं तर फिरकीपटूंना मदत करणारी असेल यात शंका नाही. पहिल्या वनडेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारताच्या 10 पैकी 9 विकेट घेतल्या आहेत. तर भारताच्या फिरकीपटूंनी 8 पैकी 4 विकेट घेतल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 169 वनडे सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 99 आणि श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. तर उर्वरित सामने निकालाविना संपले आहेत.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबूमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

दरम्यान, भारताने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. यासह भारताने श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला. दुसरीकडे, वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकण्याची भारताला संधी होती. पण भारताने ती गमावली. त्यामुळे मालिकेत आता 0-0 ने बरोबरी आहे.

Follow Us
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात