AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 वर्षांचा इतिहास बदलणार? पंड्यावर मोठी जबाबदारी!

IND vs WI 3rd T-20 : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. आजच्या सामन्यानंतर जवळपास 17 वर्षांचा इतिहास बदलला जाण्याची शक्यता आहे.

Ind vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 वर्षांचा इतिहास बदलणार? पंड्यावर मोठी जबाबदारी!
| Updated on: Aug 08, 2023 | 8:30 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंंडिजमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील तिसरा सामना आज पार पडणार आहे. आजचा सामना म्हणजे पूर्ण मालिकेचा निकाल आहे, कारण वेस्ट इंडिज संघाकडे 2-0 ची आघाडी असून आजच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर त्यांच्याकडे विजयी आघाडी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. इतकंच नाहीतर आजच्या सामन्यानंतर जवळपास 17 वर्षांचा इतिहास बदलला जाणार आहे.

17 वर्षांचा कोणता इतिहास बदलला जाणार?

टीम इंडियाचा आजच्या सामन्यामध्ये पराभव झाला तर गेल्या 17 वर्षांनंतर कॅरेबियन संघाकडून टीम इंडियाचा तीन सामन्यात पराभव होणार आहे. 2006 साली वेस्ट इंडिज संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने भारतामध्ये येत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कोणताही मालिका गमावली नाही.

जर आजच्या सामन्यात पराभव झाला तर हा 17 वर्षांता रेकॉर्ड मोडला जाणार आहे. त्यासाठी हार्दिक पंड्या आणि कंपनीला सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये हातातोंडाशी आलेल घास विंडिजच्या तळाच्या फलंदाजांनी ओढून घेतला होता.

दरम्यान,  आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. हार्दिक पंड्या सलामीवीर शुबमन गिल याच्या जागी संघात यशस्वी जयस्वाल याला संधी देऊ शकतो. मागील दोन्ही सामन्यामध्ये गिल अपयशी ठरत असलेला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेल याच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. कारण अक्षरला गेल्या सामन्यात एकही ओव्हर पंड्याने दिली नव्हती.

तिसऱ्या टी-20 साठीची संभाव्य प्लेइंग 11

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.