AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : भावा मानलं रे! टीम इंडियाबाबत रविंद्र जडेजाची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र टी-20 संघाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर बुधवारी बीसीसीआयने घोषणा केल्यावर स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याची भविष्यवाणी खरी ठरली आहे. 

Team India : भावा मानलं रे! टीम इंडियाबाबत रविंद्र जडेजाची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 07, 2023 | 12:12 AM
Share

मुंबई : बीसीसीयने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र टी-20 संघाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर बुधवारी बीसीसीआयने घोषणा केल्यावर स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

रविंद्र जडेजाने कोणती भविष्यवाणी केलेली?

टीम इंडियामध्ये निवड झालेल्या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूबाबत आधीच भविष्यवाणी केली होती. दोन युवा खेळाडू त्यातील एक यशस्वी जयस्वाल आणि दुसरा तिलक वर्मा आहे. रविंद्र जडेजाने याआधीच यामधील एका खेळाडूच्या निवडीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.

नेमका कोण तो खेळाडू?

रविंद्र जडेजाने भविष्यवाणी केलेला खेळाडू तिलक वर्मा आहे. तिलक वर्मा याच्यासोबत जडेजाने फोटो पोस्ट केला होता, टीम इंडियाच्या भविष्यासोबत चिल करताना, असं कॅप्शन ठेवत त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

तिलक वर्माने डिसेंबर 2018 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत एकूण 7 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 40.90 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेशा आहे. त्यासोबतच 25 लिस्ट ए सामन्यांमध्ये 56.18 च्या सरासरीने 1236 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

Follow Us
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी