AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: ‘पाणी वाचवा, झटपट आंघोळ उरका’, BCCI ला K L Rahul च्या टीमला हे का सांगावं लागलं?

IND vs ZIM: भारतीय संघ सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. दुर्देवाने झिम्बाब्वे मधली सध्याची परिस्थिती खराब आहे.

IND vs ZIM: 'पाणी वाचवा, झटपट आंघोळ उरका', BCCI ला K L Rahul च्या टीमला हे का सांगावं लागलं?
| Updated on: Aug 16, 2022 | 4:09 PM
Share

मुंबई: भारतीय संघ सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. दुर्देवाने झिम्बाब्वे मधली सध्याची परिस्थिती खराब आहे. झिम्बाब्वे राजधानी हरारे शहर सध्या पाणी संकटाचा सामना करत आहे. हरारे शहरात मागच्या तीन दिवसांपासून पाणी आलेलं नाही. लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी रांग लावल्याच चित्र आहे. या संकट काळात BCCI ने के.एल.राहुलच्या संघाला शक्य तितक पाणी वाचवण्याची आणि झटपट आंघोळ उरकण्याची सूचना केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतही अशीच स्थिती होती

2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती होती. केप टाऊनच्या अनेक भागात पाणी नव्हतं. बीसीसीआयने त्यावेळी सुद्धा पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं होतं. अनेक हॉटेल्सनी सुद्धा बोर्ड लावून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवाहन केलं होतं.

पाणी वाया घालवू नका

“हरारे मधील पाण्याची स्थिती गंभीर आहे. खेळाडूंना याची कल्पना देण्यात आली आहे. काहीही झालं, तरी पाणी वाया घालवू नका, असं खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. कमीत कमी वेळात आंघोळ उरकण्याची सूचना केली आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितलं.

दुष्काळ कारण नाही

दरवर्षी हरारे शहरात पाणी संकट निर्माण होतं. 2019 मध्ये परिस्थिती इतकी वाईट होती की, लोकांना खराब पाणी वापराव लागलं होतं. हरारेच्या अनेक भागात खासकरुन पश्चिम भागात तीव्र पाणी टंचाई आहे. हरारे पश्चिम मध्ये मागच्या तीन आठवड्यांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. हरारे मध्ये जे पाणी संकट निर्माण झालय, त्यामागे दुष्काळ कारण नाहीय.

20 लाख लोकांना पाणी पुरवठा होतो

मॉरटॉन जॅफफ्रे येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट मध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक केमिकल्स उपलब्ध नाहीयत, हे तिथल्या पाणी टंचाईच मूळ कारण आहे. या प्लान्ट मधून 20 लाख लोकांना पाणी पुरवठा होतो. भारतीय संघ 2016 च्या दौऱ्यात ज्या हॉटेल मध्ये उतरला होता, तिथे तर मागच्या महिन्यात परिस्थिती खूपच वाईट होती. हॉटेल मध्ये उतरलेल्या पाहुण्यांसाठी पाणीच नव्हतं.

Follow Us
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?