AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: रुट-बेयरस्टो नाही, स्वत:चाच खेळाडू भारतासाठी बनला विलन, विजयापासून संघाला नेलं दूर

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीवर (Edgbaston Test) पहिले तीन दिवस टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. पण चौथ्यादिवशी भारताची पकड सैल झाली. ज्याचा पुरेपूर फायदा इंग्लिश संघाने उचलला.

IND vs ENG: रुट-बेयरस्टो नाही, स्वत:चाच खेळाडू भारतासाठी बनला विलन, विजयापासून संघाला नेलं दूर
ind vs eng
| Updated on: Jul 05, 2022 | 12:34 PM
Share

मुंबई: एजबॅस्टन कसोटीवर (Edgbaston Test) पहिले तीन दिवस टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. पण चौथ्यादिवशी भारताची पकड सैल झाली. ज्याचा पुरेपूर फायदा इंग्लिश संघाने उचलला. भारताने इंग्लंडसमोर (IND vs ENG) विजयासाठी 378 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. सुरुवातीला हे टार्गेट अवघड वाटत होते. पण इंग्लंडचे सलामीवीर लीस आणि क्रॉलीने दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रुट-बेयरस्टो (Root-Bairstow) जोडीने त्या पायावर कळस चढवला. त्यामुळे सध्या इंग्लंडसाठी विजय सोपा दिसत आहे. भारतीय गोलंदाज काल संघर्ष करत होते. त्यांना आधी लीस-क्रॉली जोडीने त्यानंतर रुट-बेयरस्टो जोडीने दाद दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळालं नाही. भारतीय संघाच्या या स्थितीला एक खेळाडूही जबाबदार आहे. ज्याने महत्त्वाच्या प्रसंगी झेल सोडला. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं.

टीम इंडिया कदाचित कमबॅक करेल

टीम इंडियाने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडकडून एलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने चांगली सुरुवात केली. दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर असं वाटलं की, टीम इंडिया कदाचित कमबॅक करेल. पण भारतासाठी त्यांचाच एक खेळाडू विलन बनला. मागच्या मॅचमध्ये शतक झळकवणारा जॉनी बेयरस्टो चांगल्या फॉर्म मध्ये आहे.

या पार्ट्नरशिपने टीम इंडियाला विजयापासून दूर नेलं

जॉनी बेयरस्टो 14 धावांवर खेळत असताना, त्याला आऊट करण्याची चांगली संधी होती. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. चेंडू बेयरस्टोच्या बॅटची कड घेऊन स्लीप मध्ये गेला. पण हनुमा विहारीने हा झेल सोडला. ही चूक टीम इंडियाला खूप भारी पडली. रुटने बेयरस्टो सोबत शतकी भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने टीम इंडियाला विजयापासून दूर नेलं. हनुमा विहारी फलंदाजीतही विशेष चमक दाखवू शकला नाही. रोहित शर्मा कोविडमुळे या कसोटीत खेळू शकला नाही. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला सलामीला पाठवलं. त्याच्याजागी हनुमा विहारी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला. पहिल्या डावात त्याने फक्त 20 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 11 धावा केल्या.

रुट-बेयरस्टोची जबरदस्त फलंदाजी

आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने जबरदस्त फलंदाजी केली. दोघेही खेळपट्टीवर टिकून आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या तीन बाद 259 धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे.

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक