AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. पण या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार आहे. पण भारताकडे या स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानला पराभूत करण्याची ब्लू प्रिंट असणार आहे. कसं काय ते जाणून घ्या.

आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा पराभव निश्चित! टीम इंडियाकडे विजयाची अशी रणनिती, जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2025 | 8:02 PM
Share

आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी आठ संघांनी कंबर कसली आहे. यात भारतीय संघ जेतेपदाचा प्रमुख दावेदार असून गतविजेता आहे. भारताच्या विजयाच्या वाटेत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा अडसर ठरू शकतो. पण भारताला पाकिस्तानविरुद्ध रणनिती ठरवण्यासाठी आधीच ब्लू प्रिंट मिळणार आहे. 29 ऑगस्टपासून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात ट्राय सीरिज होणार आहे. पाकिस्तानने या ट्राय सीरिज आणि आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघात तेच खेळाडू आहेत. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाचं अफगाणिस्तान आणि युएईविरुद्ध कशी कामगिरी राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण या संघाचं नेतृत्वा सलमान अली आगाकडे सोपवलं असून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना डावललं आहे. असं असताना एका टीव्ही शोमध्ये शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची पिसं काढली आहेत. दुसरीकडे, भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे भारताची बाजू भक्कम आहे. पण सामन्याच्या दिवशी नाणं खणखणीत वाजणं आवश्यक आहे.

शोएब अख्तरने सांगितलं की, पाकिस्तान ट्राय सीरिजमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध जिंकणार नाही. ही मालिका संपेल तसं आशिया कपमधून बाहेर असलेल्या बाबर आझमला संघात घेतलं जाईल. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ ट्राय सीरिजमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तर भारतासाठी चांगली बातमी आहे. कारण या मालिकेतील पाकिस्तानच्या कामगिरीकडे भारतीय संघाचं बारीक लक्ष असेल. काय चुका होतात त्याचं योग्य निरीक्षण करून अमलबजावणी केली जाईल. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तान संघावर दडपण वाढलं आहे.

पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेपूर्वी ही मालिका जिंकणं काहीही करून भाग आहे. कारण पाकिस्तान संघावर त्यांच्याच आजी माजी खेळाडूंनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानने ही मालिका जिंकली नाही तर आशिया कप स्पर्धेपूर्वी संघात लगेच बदल केले जातील. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंना बाहेर केलं जाईल. दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि युएई संघांना लिंबूटिंबू समजून चालणार नाही. मागच्या काही वर्षात या संघात कमालीची सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तान या स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकते.

Follow Us
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.