AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची कमाल, दक्षिण आफ्रिकेत भारताने जिंकली सीरीज

IND vs SA: T20 सीरीजच्या पहिल्या चार सामन्यात टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. 2 गोलंदाजांनी घेतल्या 5 विकेट.

IND vs SA: टीम इंडियाच्या दोन गोलंदाजांची कमाल, दक्षिण आफ्रिकेत भारताने जिंकली सीरीज
ind vs sa Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 03, 2023 | 12:09 PM
Share

डरबन: भारताच्या अंडर 19 महिला टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा T20 सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला टीमने 5 टी 20 सामन्यांची सीरीज जिंकली आहे. मालिकेतील एक सामना अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तरी सीरीज भारताच्याच नावावर होईल. टी 20 सीरीच्या पहिल्या चार सामन्यात टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. सीरीजचा दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकेतील पहिला टी 20 सामना भारताने 54 धावांनी जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर 19 टीमने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या टी 20 सामन्यात 4 विकेटने हरवलं.

शेवटचा टी 20 सामना कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरीजमधील पाचवा व शेवटचा टी 20 सामना 4 जानेवारीला खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेची महिला टीम प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना खेळेल.

88 चेंडूत जिंकला चौथा सामना

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी 20 सामना 15 ओव्हर पूर्ण होण्याआधीच जिंकला. भारताच्या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची वाट लावली. त्यामुळे टीम इंडिया हा सामना लवकर जिंकणार असा अंदाज होता.

टीम इंडियाच्या 2 गोलंदाजांची कमाल

भारताच्या अंडर 19 महिला टीमच्या दोन गोलंदाज फलक आणि नजलाने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. नजलाने 3 ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 3 विकेट काढल्या. फलकने 4 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 2 विकेट काढल्या. दोघींनी किफायती आणि प्रभावी गोलंदाजी केली. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 महिला टीमने चौथ्या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 86 धावा केल्या. टीम इंडियाकडून शेफाली वर्माच्या सर्वाधिक धावा

टीम इंडियाला विजयासाठी 87 धावांच सोप लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने 14.4 ओव्हर्समध्येच लक्ष्य गाठलं. भारताने सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 विकेट गमावल्या. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 29 धावा केल्या. या इनिंगमध्ये शेफालीचा स्फोटक फलंदाजीचा अंदाज दिसला नाही.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.