AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: भारताकडून आम्ही का मार खाल्ला? Babar Azam ने सांगितली पराभवाची कारणं

IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने (Babar Azam) आपला संघ कुठे कमी पडला? ते सांगितलं.

IND vs PAK: भारताकडून आम्ही का मार खाल्ला? Babar Azam ने सांगितली पराभवाची कारणं
babar-rohitImage Credit source: twitter
| Updated on: Aug 29, 2022 | 11:04 AM
Share

मुंबई: भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) धुळ चारुन आशिया कप (Asia cup) स्पर्धेत आपलं अभियान सुरु केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला 5 विकेटने हरवलं. या पराभवानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने (Babar Azam) आपला संघ कुठे कमी पडला? ते सांगितलं. बाबर आजमच्या मते, खराब फलंदाजी पाकिस्तानच्या पराभवाचं एक कारण आहे. म्हणजे एकप्रकारे भारताने पाकिस्तानच्या शक्तीस्थळालाच कमकुवत केलं. सध्याच्या पाकिस्तानी संघातील 2 फलंदाजांचा टी 20 मधील टॉप 3 फलंदाजांमध्ये समावेश होतो.

टॉप 3 मध्ये बाबर आणि रिजवान

बाबर आजम जगातील नंबर एक टी 20 फलंदाज आहे. मोहम्मद रिजवान तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरीही हे दोन फलंदाज भारताविरोधात चालले नाहीत. ते चांगली भागीदारी करु शकले नाहीत. बाबरने पराभवासाठी हेच कारण असल्याचं सांगितलं. बाबरने 10 धावा केल्या. रिजवानने सर्वाधिक 43 रन्स केल्या. सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बाबर आजम म्हणाला की, “आमचे खेळाडू मोठी भागीदारी करु शकले नाहीत. भागीदारी झाली असती, तर निकाल वेगळा लागला असता” आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या, असं बाबर म्हणाला. कमीत कमी 50 धावांची भागीदारी होणं आवश्यक होतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 148 धावांच लक्ष्य दिलं होतं. भारताने पाच विकेट गमावून आणि 2 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं.

आफ्रिदीच्या जागी नसीम शाह

फलंदाजांच्या कामगिरीवर बाबर आजम निराश आहे. पण गोलंदाजांच्या कामगिरीवर तो समाधानी आहे. आम्हाला सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचायचा होता. नवाजने शेवटची ओव्हर चांगली टाकली. पण निकाल आमच्याबाजूने लागला नाही. डेब्यु करणाऱ्या नसीम शाहच कौतुक केलं. त्याने शाहीन शाह आफ्रिदीची कमतरता जाणवू दिली नाही, अशा शब्दात बाबरने त्याचं कौतुक केलं. नसीमने नव्या चेंडूने कमालीची गोलंदाजी केली. आशिया कप स्पर्धा सुरु होण्याआधी पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रुपात झटका बसला. दुखापतीमुळे तो या स्पर्धेला मुकला. सध्या तो टीम सोबत दुबई मध्ये आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.