AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: भारताकडून आम्ही का मार खाल्ला? Babar Azam ने सांगितली पराभवाची कारणं

IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने (Babar Azam) आपला संघ कुठे कमी पडला? ते सांगितलं.

IND vs PAK: भारताकडून आम्ही का मार खाल्ला? Babar Azam ने सांगितली पराभवाची कारणं
babar-rohitImage Credit source: twitter
| Updated on: Aug 29, 2022 | 11:04 AM
Share

मुंबई: भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) धुळ चारुन आशिया कप (Asia cup) स्पर्धेत आपलं अभियान सुरु केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला 5 विकेटने हरवलं. या पराभवानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने (Babar Azam) आपला संघ कुठे कमी पडला? ते सांगितलं. बाबर आजमच्या मते, खराब फलंदाजी पाकिस्तानच्या पराभवाचं एक कारण आहे. म्हणजे एकप्रकारे भारताने पाकिस्तानच्या शक्तीस्थळालाच कमकुवत केलं. सध्याच्या पाकिस्तानी संघातील 2 फलंदाजांचा टी 20 मधील टॉप 3 फलंदाजांमध्ये समावेश होतो.

टॉप 3 मध्ये बाबर आणि रिजवान

बाबर आजम जगातील नंबर एक टी 20 फलंदाज आहे. मोहम्मद रिजवान तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरीही हे दोन फलंदाज भारताविरोधात चालले नाहीत. ते चांगली भागीदारी करु शकले नाहीत. बाबरने पराभवासाठी हेच कारण असल्याचं सांगितलं. बाबरने 10 धावा केल्या. रिजवानने सर्वाधिक 43 रन्स केल्या. सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बाबर आजम म्हणाला की, “आमचे खेळाडू मोठी भागीदारी करु शकले नाहीत. भागीदारी झाली असती, तर निकाल वेगळा लागला असता” आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या, असं बाबर म्हणाला. कमीत कमी 50 धावांची भागीदारी होणं आवश्यक होतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 148 धावांच लक्ष्य दिलं होतं. भारताने पाच विकेट गमावून आणि 2 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं.

आफ्रिदीच्या जागी नसीम शाह

फलंदाजांच्या कामगिरीवर बाबर आजम निराश आहे. पण गोलंदाजांच्या कामगिरीवर तो समाधानी आहे. आम्हाला सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचायचा होता. नवाजने शेवटची ओव्हर चांगली टाकली. पण निकाल आमच्याबाजूने लागला नाही. डेब्यु करणाऱ्या नसीम शाहच कौतुक केलं. त्याने शाहीन शाह आफ्रिदीची कमतरता जाणवू दिली नाही, अशा शब्दात बाबरने त्याचं कौतुक केलं. नसीमने नव्या चेंडूने कमालीची गोलंदाजी केली. आशिया कप स्पर्धा सुरु होण्याआधी पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रुपात झटका बसला. दुखापतीमुळे तो या स्पर्धेला मुकला. सध्या तो टीम सोबत दुबई मध्ये आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त