AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीज वर्षानंतर भारत पाकिस्तान आमने सामने येणार, भुवनेश्वर कुमार म्हणतो, ‘जोरदार टक्कर होईल!’

भारत आणि पाकिस्तान सामन्याची जशी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते तशी ती खेळाडूंना देखील असते. काल टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधले ग्रुप क्लिअर झालेत. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाच गटात आहे. (India vs pakistan T20 World Cup Bhuvneshwar kumar)

अडीज वर्षानंतर भारत पाकिस्तान आमने सामने येणार, भुवनेश्वर कुमार म्हणतो, 'जोरदार टक्कर होईल!'
भुवनेश्वर कुमार
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 7:29 AM
Share

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाबाबत (ICC T20 World Cup 2021) एक मोठी माहिती समोर आली आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान जवळपास अडीज वर्षानंतर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याचविषयी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विचारलं असता, त्यांच्याविरुद्ध खेळणं नेहमीच रोमांचक असतं, दबाव असतो, अंगात एक वेगळी उर्जा संचारते, पण आणखी या सामन्यांना वेळ आहे, अशी पहिली प्रतिक्रिया भुवनेश्वर कुमारने दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्याची जशी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते तशी ती खेळाडूंना देखील असते. काल टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधले ग्रुप क्लिअर झालेत. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाच गटात आहे. त्यामुळे टी ट्वेन्टी स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे मात्र नक्की… जवळपास अडीज वर्षानंतर हे दोन्ही संघ एकमेकांना ललकारताना दिसतील.

काय म्हणाला भुवनेश्वर कुमार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक होत असतो. परंतु भारतीय संघ सध्या टी -20 वर्ल्डकपबद्दल विचार करत नाही कारण आयसीसी टी ट्वेन्टी स्पर्धेपूर्वी बरेच क्रिकेट खेळायचं आहे.

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत असलेल्या भुवनेश्वर कुमारने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटलं, “पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच रोमांचक असते आणि या सामन्यात नेहमीच दबाव असतो म्हणून नक्कीच ते खूपच रोमांचक आहे. सामन्यात जोरदार टक्कर होईल….”

पण खरं सांगायचं तर आम्ही टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधल्या भारत पाक सामन्याविषयी विचार केला नाही, कारण त्या अगोदर बरंच क्रिकेट खेळायचं आहे. आम्हाला श्रीलंकेत सामने खेळायचे आहेत, इंग्लंडमध्ये कसोटी सामने आहेत, त्यानंतर आयपीएल आणि नंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप आहे…. आयपीएल संपल्यावर वर्ल्ड कपबद्दल संघ विचार करेल”

वर्ल्ड कपमधले ग्रुप कसे?

सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-1 मध्ये आहेत. या संघामध्ये सामने कधी आणि कसे होणार याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(India vs Pakistan T20 World Cup Bhuvneshwar Kumar)

हे ही वाचा :

‘प्यार का कोई धर्म नही होता…’ भारतीय खेळाडू शिवम दुबे मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध 

IND vs ENG : ऋषभ पंतला कोरोना, संघाला नव्या यष्टीरक्षकाची गरज, ‘या’ खेळाडूचं सूचक ट्वीट

IND vs SL : श्रीलंका संघाकडून एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला सोपवलं कर्णधारपद

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.