AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला...
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 23, 2026 | 4:12 PM
Share

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय तिसऱ्या टी20 मालिकेसाठी सज्ज आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून टीम इंडिया श्रेयसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. श्रेयस अय्यरने नेतृत्व स्वीकारल्यापासून एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेत तरी पहिला विजय मिळवणार का? याकडे लागून आहे. कारण आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने आधीच 0-2 ने मात दिली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे धक्का बसला आहे. सामन्याच्या काही तासांआधी फलंदाज मिल्टन शुंबा या मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी इनोसेंट काइया याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णंधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही. पण सराव खेळपट्ट्या आणि मैदानावरील सराव खेळपट्ट्या पाहता, तिथे चांगला बाऊन्स मिळत होता. त्यामुळे निश्चितच, हा एक महत्त्वाचा पैलू आहे. खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही, पण तसा अंदाज आहे. श्रेयस अय्यर झिम्बाब्वेबाबत म्हणाला की, ते गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः विश्वचषकात, ज्याप्रकारे खेळले, ते अप्रतिम होते. ते डोळ्यांना सुखद वाटत होते. फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करत होते. ते अद्भुत होते. प्लेइंग 11 बाबत श्रेयस अय्यरने सांगितलं की, आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन करन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी.

Follow Us
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा