AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ऋषभ पंतला बॉलर्सचा वापर करता येत नाही, आशिष नेहराने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

IND vs SA: पहिल्या T 20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) सात विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे.

IND vs SA: ऋषभ पंतला बॉलर्सचा वापर करता येत नाही, आशिष नेहराने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत-रिकी पाँटिंग Image Credit source: IPL
| Updated on: Jun 10, 2022 | 7:35 PM
Share

मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) सात विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे. पहिल्या पराभवानंतर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने (Ashish nehra)पंतच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. युजवेंद्र चहलकडून फक्त 2.1 ओव्हर गोलंदाजी करुन घेण्याच्या पंतच्या रणनितीने नेहरा हैराण झाला आहे. आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅप मिळवणाऱ्या युजवेंद्र चहलने फक्त 13 चेंडू टाकले. त्यात त्याने 26 धावा दिल्या. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतने कुलदीप यादवकडूनही पूर्ण षटकं गोलंदाजी करुन घेतली नव्हती. कुलदीप हा यंदाच्या आयपीएल सीजनमधला दिल्लीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रासी वॅन डर डुसे आणि डेविड मिलरची जोडी फोडण्यासाठी ऋषभ पंतने चहलकडे चेंडू सोपवायला पाहिजे होता.

बचावात्मक गोलंदाजी करुन फायदा नाही

पहिल्या सामन्यात भारताने खराब गोलंदाजी बरोबर सुमार फिल्डिंगही केली. भारताने अनेक महत्त्वाचे झेल सोडले. क्रिकबजशी बोलताना नेहरा म्हणाला की, “पंत एक युवा कॅप्टन आहे. तो यातून शिकेल व अधिक सुधारणा करेल. चहलने फक्त 2.1 षटकं गोलंदाजी केली. मधल्या षटकात विकेट काढण्याचा पर्याय असला पाहिजे. तुम्हाला महत्त्वाच्या फलंदाजाचा रोखायचं असेल, तर तुम्हाला त्याचा विकेट काढावा लागेल. बचावात्मक गोलंदाजी करुन काहीही साध्य होणार नाही”

दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य

भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू बाकी ठेवून सात विकेटने सामना जिंकला. मिलर आणि डुसेने शानदार शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. कॅप्टन पंतने 29 धावा केल्या. हार्दिक पंड्याने 12 चेंडूत 31 धावा केल्या.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.