AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे ‘हे’ आहेत तीन हिरो

या दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले होते. संघात गटबाजी असल्याची चर्चा होती. पण या सर्व चर्चा, वादांना मागे सोडत टीम इंडियाने दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे.

IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे 'हे' आहेत तीन हिरो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 4:52 PM
Share

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमध्ये भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताला 113 धावांनी हा सामना जिंकता आला. या दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले होते. संघात गटबाजी असल्याची चर्चा होती. पण या सर्व चर्चा, वादांना मागे सोडत टीम इंडियाने दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे. (India vs South Africa Three indian players who play important role in indias win)

भारताच्या या पहिल्या कसोटी विजयाचे मुख्य तीन नायक आहे. केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शामी या तिघांनी पहिल्या डावात केलेली कामगिरी निर्णायक ठरली. केएल राहुलने उपकर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने पहिल्या डावात शानदार 123 शतक झळकावले. मयांकने 60 अर्धशतक झळकावून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या डावात 117 धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.

अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. पण या दोन फलंदाजांनुळे भारताला 300 धावांची वेस ओलांडता आली. 327 धावांवर पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर गोलंदाजांनी भूमिका महत्त्वाची होती. मोहम्मद शामीने गोलंदाजीचा भार समर्थपणे संभाळला. त्याने पहिल्या डावात 16 षटकात 44 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

त्याने सलामीवीर मार्कराम, बावुमा हे महत्त्वाचे विकेट घेतले. दुसऱ्या डावातही शामीने भेदक मारा कायम ठेवला. त्याने आणि बुमराहने मिळून प्रत्येकी तीन विकेट घेतले. फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमुळे भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे इथेही भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी कायम आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.