AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे ‘हे’ आहेत तीन हिरो

या दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले होते. संघात गटबाजी असल्याची चर्चा होती. पण या सर्व चर्चा, वादांना मागे सोडत टीम इंडियाने दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे.

IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे 'हे' आहेत तीन हिरो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 4:52 PM
Share

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमध्ये भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताला 113 धावांनी हा सामना जिंकता आला. या दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले होते. संघात गटबाजी असल्याची चर्चा होती. पण या सर्व चर्चा, वादांना मागे सोडत टीम इंडियाने दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे. (India vs South Africa Three indian players who play important role in indias win)

भारताच्या या पहिल्या कसोटी विजयाचे मुख्य तीन नायक आहे. केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शामी या तिघांनी पहिल्या डावात केलेली कामगिरी निर्णायक ठरली. केएल राहुलने उपकर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने पहिल्या डावात शानदार 123 शतक झळकावले. मयांकने 60 अर्धशतक झळकावून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या डावात 117 धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.

अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. पण या दोन फलंदाजांनुळे भारताला 300 धावांची वेस ओलांडता आली. 327 धावांवर पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर गोलंदाजांनी भूमिका महत्त्वाची होती. मोहम्मद शामीने गोलंदाजीचा भार समर्थपणे संभाळला. त्याने पहिल्या डावात 16 षटकात 44 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

त्याने सलामीवीर मार्कराम, बावुमा हे महत्त्वाचे विकेट घेतले. दुसऱ्या डावातही शामीने भेदक मारा कायम ठेवला. त्याने आणि बुमराहने मिळून प्रत्येकी तीन विकेट घेतले. फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमुळे भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे इथेही भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी कायम आहे.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?