AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies Today Match Weather Report: पहिल्या वनडेत पाऊस व्यत्यय आणेल का? वातावरण कसं असेल, जाणून घ्या

India vs West Indies Today Match Weather Report: चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भारतीय संघ (Team india) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी जागा आणि संघ पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय संघ तीन आठवडे इंग्लंड (England) मध्ये होता.

India vs West Indies Today Match Weather Report: पहिल्या वनडेत पाऊस व्यत्यय आणेल का? वातावरण कसं असेल, जाणून घ्या
ind vs wiImage Credit source: AFP
| Updated on: Jul 22, 2022 | 5:04 PM
Share

मुंबई: चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भारतीय संघ (Team india) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी जागा आणि संघ पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय संघ तीन आठवडे इंग्लंड (England) मध्ये होता. इंग्लंड मध्ये जय-पराजय अनुभवल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियाई दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आज म्हणजे 22 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होत आहे. भारतीय संघ आधी वनडे सीरीज नंतर पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

कसं आहे पोर्ट ऑफ स्पेन मध्ये वातावरण?

भारत आणि वेस्ट इंडिज मधील पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये पहिला सामना आहे. त्रिनिदादच्या राजधानीमध्ये दोन दिवसापूर्वीच पावसाने आपलं दर्शन दिलं होतं. आज शुक्रवारी सुद्धा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारच्या पावसाने भारत आणि वेस्ट इंडिजच्या सराव सत्रात अडथळा आणला होता. त्यामुळे दोन्ही टीम्सना इन्डोर प्रॅक्टिस करावी लागली.

पाऊस व्यत्यय आणेल का?

भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.

क्वीन्स पार्क ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड

क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत