AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्यावनडेसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11, कोच राहुल द्रविड बदल करतील का?

भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (IND vs WI) विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 पुढे आहे. आता दुसरी वनडे जिंकण्यावर भारतीय टीमची (Team india) नजर आहे.

IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्यावनडेसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11, कोच राहुल द्रविड बदल करतील का?
team india Image Credit source: AFP
| Updated on: Jul 24, 2022 | 7:30 AM
Share

मुंबई: भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (IND vs WI) विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 पुढे आहे. आता दुसरी वनडे जिंकण्यावर भारतीय टीमची (Team india) नजर आहे. रविवारी दोन्ही संघ आमने-सामने येतील. विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिज (West indies) हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. हा सामना गमावल्यास वेस्ट इंडिजकडे मालिकेत पुनरागमनाची पुढची संधी नसेल. मायदेशात प्रतिष्ठा वाचवण्याचा वेस्ट इंडिजचा पुरेपूर प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजसाठी दुसरी मॅच जिंकणं इतकं सोप नसेल. कारण टीम इंडियाने प्रत्येक विभागात त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेशकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियासमोर ते टिकणार नाहीत, असं बोललं जात होतं. पण असं झालं नाही. त्यांनी टीम इंडियाला जोरदार लढत दिली. अवघ्या 3 रन्सने भारताने हा सामना जिंकला.

दुसऱ्या वनडेत टीम इंडियात बदल होतील का?

दुसरा सामना जिंकल्यास भारताकडे मालिकेत विजयी आघाडी होईल. आपल्या नेतृत्वाखाली संघाने मालिका जिंकावी, अशी शिखर धवनची इच्छा असेल. भारताने या सीरीजसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय. पहिली वनडे जिंकली. आता दुसऱ्यावनडेत राहुल द्रविड, शिखर धवन काही बदल करतील का? हा प्रश्न आहे. पण राहुल द्रविड यांची पॉलिसी बघता, असा बदल ते करणार नाहीत. पहिल्या वनडेचाच संघ दुसऱ्या वनडेतही उतरवला जाईल.

कशी असेल वेस्ट इंडिजची प्लेइंग 11

वेस्ट इंडिजने सामना गमावला. पण त्यांनी भारतीय संघाला त्रास दिला होता. त्यांच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. फलंदाजीत त्यांनी चांगली टक्कर दिली. भारताच्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचल्यानंतर त्यांनी सामना गमावला. वेस्ट इंडिजही आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्टइंडीजः निकोलस पूरन (कॅप्टन), शे होई, शामराह ब्रूक्स, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, रोवमन पावेल, जेडन सील्स, अल्जारी जोसफ, रोमारियो शेफर्ड, गुडकेश मोती, अकील होसैन.

भारतः शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.