IND vs AUS | टीम इंडियाचा विक्रमावर विक्रम, असा पराक्रम करणारा पहिला संघ

India vs Australia 4th T20I | भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विश्वविक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करत सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने केला आहे. भारताच्या ऋतुराज गायकवाड याने टी 20 सामन्यात चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

IND vs AUS | टीम इंडियाचा विक्रमावर विक्रम, असा पराक्रम करणारा पहिला संघ
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 8:00 AM

रायपूर | 2 डिसेंबर 2023 : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा 20 धावांनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचे दिलेले आव्हान त्यांना पेलता आले नाही. भारताच्या गोलंदाजांसमोर 7 बळी गमावून ऑस्ट्रेलिया केवळ 154 धावाच करु शकला. यामुळे टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. परंतु हा सामना जिंकणे भारतासाठी विश्वविक्रम ठरला. आता भारतीय संघ सर्वाधिक टी 20 सामने जिंकणारा संघ झाला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा नावावर होता.टी 20 सामन्याच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 4-1 अशी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

भारताचे हे विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या ऋतुराज गायकवाड याने टी 20 सामन्यात चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कमी डावांत हा टप्पा गाठणारा तो न्यूझीलंडच्या डीवोन कॉन्वेसह चौथा वेगवान फलंदाज ठरला आहे. सलग तीन डावांत 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी 20 धावा करणारा गायकवाड हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली याच्यानंतर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

टाय सामने धरल्यास भारताचा 139 वा विजय

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच इतिहास रचला. टीम इंडियाने हा 136वा टी-20 विजय मिळवला. यापूर्वी सर्वाधिक टी-20 मध्ये विजय मिळवणारा संघ पाकिस्तानचा होता. पाकिस्तानने 135 सामन्यात विजय मिळवला आहे. टी-20 मध्ये टाय होणाऱ्या सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये काढला जातो. भारताचे ते विजय धरल्यास 139 सामने भारत जिंकला आहे. पाकिस्तान संघ 136 टी-20 सामने जिंकला आहे. भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानात 14 टी-20 मालिकेत विजयी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियेने 2-0 अशी मालिका जिंकली होती.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.