AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Rohit Sharma ची बॅट चालणार त्या दिवशी Mumbai Indians जिंकणार

IPL 2022: मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नशीब खराब आहे. या लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाला आहे.

IPL 2022: Rohit Sharma ची बॅट चालणार त्या दिवशी Mumbai Indians जिंकणार
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा Image Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सच (Mumbai Indians) नशीब खराब आहे. या लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाला आहे. बुधवारी पंजाब किंग्स (Punjab kings) विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या सीजनमध्ये लीगमध्ये एकूण 10 टीम्स खेळतायत. मुंबईच्या टीमचा प्लेऑफचा मार्गही खडतर आहे. एकदम सरस दर्जाचा खेळ केला, तर मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. याआधी खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केलं आहे. पण यावेळी आव्हान सोपं नाहीय. कॅप्टन रोहित शर्मासाठी (Rohit sharma) हा एक झटका आहे. रोहित शर्मा आता टीम इंडियाचाही कॅप्टन आहे. या लीगमध्ये टीमची कामगिरी घसरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही चिंता वाढते. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे पाचही सामने गमावले आहे. त्याची टीमच्या फॅन्सना सर्वात जास्त चिंता आहे.

मुंबई इंडियन्सच्या पराभवामध्ये मोठं अंतर

मुंबई इंडियन्सने 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळला होता. या मॅचमध्ये 10 चेंडू राखून चार विकेटने त्यांचा पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 23 धावांनी हरवलं. कोलकाता नाइट रायडर्सने तर चार ओव्हर राखून मोठा विजय मिळवला. आरसीबीने मुंबईला सात विकेटने हरवलं. त्यावेळी नऊ चेंडू बाकी होते. पंजाब किंग्स विरुद्ध सामना रोमांचक बनू शकला असता, पण मोक्याच्या क्षणी रनआऊट झाल्यामुळे पंजाबचं काम सोप झालं. 12 धावांनी मुंबईचा पराभव झाला. वरील पाच पैकी एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाबरोबर मुंबई इंडियन्सचा अटी-तटीचा संघर्ष दिसला नाही.

रोहित शर्मा पराभवाचं एक कारण

रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधील धोकादायक फलंदाज आहे. लीगमधला तो एक यशस्वी कॅप्टनही आहे. टीमला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण या सीजनमध्ये रोहित शर्मा आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यात त्याने फक्त 108 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 21.60 आणि स्ट्राइक रेट 133.33 आहे. मुंबईच्या टीमला सीजनमधले अजून नऊ सामने खेळायचे आहेत. या नऊ सामन्यातील जय-पराजयामुळे फार फरक पडणार नाही. त्याशिवाय मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.