AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: फॉर्म परत कसा मिळवणार? संघर्ष करणाऱ्या Rohit sharma ने दिलं उत्तर

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माला त्याच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने 'अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या मला अनुकूल घडल्या नाहीत' असं सांगितलं.

IPL 2022: फॉर्म परत कसा मिळवणार? संघर्ष करणाऱ्या Rohit sharma ने दिलं उत्तर
rohit sharma Image Credit source: IPL
| Updated on: May 23, 2022 | 11:20 AM
Share

मुंबई: IPL 2022 मध्ये Mumbai Indians संघ फ्लॉप ठरला, त्याचं एक प्रमुख कारण आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा (Rohit sharma) या सीजनमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. रोहित शर्मा फलंदाजी करताना टायमिंग आणि मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. IPL 2022 मध्ये रोहितच्या फलंदाजीतून या दोन्ही गोष्टी गायब दिसल्या. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाचा रोहित शर्मा एकही अर्धशतक झळकवू शकला नाही. लीगमधील मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माला त्याच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने ‘अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या मला अनुकूल घडल्या नाहीत’ असं सांगितलं. रोहितची फलंदाजी इतकी खराब झाली की, त्याला 20 च्या सरासरीनेही धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा या सीजनमध्ये 14 सामने खेळला. त्याने 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या.

पण मनासारखं घडलं नाही

“मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण मनासारखं घडलं नाही. हे माझ्या बरोबर पहिल्यांदा झालेलं नाही. हे या आधी सुद्धा घडलय. क्रिकेट इथेच संपत नाही. अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मला मानसिक दृष्ट्या मजबूत राहून, पुन्हा फॉर्म परत कसा मिळवता येईल, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला जो काही वेळ मिळालाय, मी त्यावरच मेहनत घेणार आहे. मला माझ्या फलंदाजीतील काही त्रुटींवर काम करायचं आहे” असं रोहितने उत्तर दिलं.

रोहितला विश्रांती

रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी- 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यासाठी पुढच्या महिन्यात रवाना होईल. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु झाली होती. भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार होता. पण भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाची लागण झाल्याने ही कसोटी स्थगित करण्यात आली. आता 1 जुलैला हा कसोटी सामना होईल. भारताने हा कसोटी सामना जिंकला किंवा ड्रॉ केला, तर 15 वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळेल.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप