AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final Ahmedabad Weather | चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याआधी जोरदार पाऊस, आता काय होणार?

अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 सामन्यातही जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे या सामन्याला सुरुवात होण्यास वेळ लागला होता. आता पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये महाअंतिम सामन्याआधी पाऊस झाला आहे.

IPL Final Ahmedabad Weather | चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याआधी जोरदार पाऊस, आता काय होणार?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 28, 2023 | 9:50 PM
Share

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम मॅचआधी अहमदाबादमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची आणि पर्यायाने दोन्ही संघांची चिता वाढली आहे. या पावसाचे व्हीडिओ ाणि फोटो सोशल मीडयावर व्हायरल झाले आहेत. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 26 मे रोजी झालेल्या क्वालिफायर 2 सामन्याआधीही अशाच प्रकारे पाऊस पडला होता. ज्यामुळे सामना हा 30 मिनिटं विलंबाने सुरु झाला होता.

अहमदाबादमध्ये पाऊस, सामन्याला विलंब

दरम्यान या पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. नियमानुसार टॉस 7 वाजता होणं अपेक्षित असतं. तर सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होते. मात्र या पावसामुळे टॉसला विलंब झालाय. त्यामुळे अर्थातच सामन्यालाही विलंबाने सुरुवात होणार आहे. मात्र सामना नक्की कधी सुरु होईल, ते काही सांगता येत नाही.

सामन्यातील षटकं कमी होणार?

दरम्यान पावसामुळे विलंब झाल्यास तेवढ्याच वेळेत खेळ पूर्ण करण्यासाठी सामन्यातील ओव्हर कमी केल्या जातात.  आता या अंतिम सामन्यातील ओव्हर्स कमी करण्यात येणार का, तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर विजेता कोण ठरणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांंना  पडलाय. या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.

या चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला रात्री 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत सुरुवात झाली, तर पूर्ण 20 ओव्हरचा खेळ होईल. मात्र त्यानंतर थोड्याही विलंबाने सामना सुरु झाल्यास 5-5 ओव्हरचाच खेळ होईल. यातही 5-5 ओव्हरचा खेळ हा 12 वाजून 6 मिनिटांपर्यंतच अपेक्षित आहे.  म्हणजेच, 12 वाजून 6 मिनिटांपर्यतच 5-5 ओव्हरचा खेळ होऊन निकाल लागायला हवा. पण 12 वाजून 06 मिनिटांपर्यंत पाऊस थांबलाच नाही, तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल.  29 मे हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.