AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : सलग तीन विजयानंतर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या, पुढचं गणित मुंबई ठरवणार

आयपीएल 2024 स्पर्धेत अजूनही प्लेऑफचं गणित सुटलेलं नाही. मुंबई इंडियन्स एकमेव संघ खऱ्या अर्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. तर इतर संघांमध्ये अजूनही जोरदार चुरस दिसत आहे. त्यात राजस्थान रॉयल्स सहज स्थान मिळवणार आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आशाही कायम आहेत.

IPL 2024 : सलग तीन विजयानंतर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या, पुढचं गणित मुंबई ठरवणार
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 05, 2024 | 4:05 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवातीला स्थिती नाजूक होती. मात्र त्यानंतर आरसीबीने चांगलं कमबॅक केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंघळुरुने गुजरात पराभूत करत आपणंही रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात गुजरात टायटन्सने बंगळुरुला चार गडी राखून पराभूत केलं. यासह आरसीबीने गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे. सलग तीन सामन्यात विजय मिळवत बंगळुरुचा संघ सातव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स आणि गुजरातचे प्रत्येक 8 गुण आहेत. मात्र या दोन्ही संघांच्या तुलनेत आरसीबीचा रनरेट चांगला आहे. गुजरातविरुद्धचा सामना कमी षटकात संपवल्याने त्याचा फायदा झाला आहे.गुजरात विरुद्धचा सामना आरसीबीने 38 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केला. आरसीबीचा नेट रनरेट -0.0149 इतका झाला आहे. तर गुजरातचा नेट रनरेट -1.320 इतका आहे.

आतापर्यंत आरसीबीने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवून 8 गुण झाले आहेत. तर उर्वरित तीन सामने जिंकून 14 गुण होऊ शकतात. आरसीबीचा पुढचे तीन सामने पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सशी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला गाठणं कठीण आहे. त्यामुळे लखनौ आणि हैदराबादची कामगिरी महत्त्वाची ठरेल.लखनौ आणि हैदराबादचे प्रत्येकी 12 गुण असून चार सामने शिल्लक आहे. या दोन्ही संघ तीन सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबीला संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. त्यात मुंबईचे तीन सामने सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सशी आहेत. या तिन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली तर आरसीबीला फायदा होईल. तसेच मुंबईचे फक्त 12 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफ गाठणं शक्य नाही. त्यामुळे आरसीबी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा पुढचे तीन सामने राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि लखनौशी आहे. यात आरसीबी आणि राजस्थानसोबतचा सामना सोडून उर्वरित सामन्यात लखनौला पराभूत केलं. तर आरसीबीचा फायदा होईल. कारण सध्या दिल्लीचे 10 गुण आहेत. दोन एका सामन्यात विजय मिळवला तर 12 गुण होतील.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.