AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित कट टू कट, महेंद्रसिंह धोनी म्हणाला….

आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचं कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या स्पर्धेत खेळलेल्या ८ पैकी ६ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित किचकट झालं आरहेय. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान मुंबईने १५.४ षटकात पूर्ण केलं.

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित कट टू कट, महेंद्रसिंह धोनी म्हणाला....
महेंद्रसिंह धोनीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 11:30 PM
Share

आयपीएल २०२५ स्पर्धेत प्रत्येक सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेचं चित्र बदलताना दिसत आहे. खरं तर चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद वगळता इतर सात संघात प्लेऑफची खऱ्या अर्थाने चुरस सुरु झाली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमवून १७६ धावा केल्या. तसेच विजयासाठी १७७ धावा दिल्या. मुंबई इंडियन्सने हे आव्हान १५.४ षटकात पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सचं या पराभवानंतर गणित बिघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी फक्त २ सामन्यात विजय आणि ६ सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे ४ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित आता कट टू कट आलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर उर्वरित सर्वच्या सर्व सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी १६ गुणांची आवश्यकता आहे. चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित ६ सामन्यात विजय मिळवला तर १६ होतील. नाही तर उर्वरित संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे चेन्नई सुपर एखाद दुसरा सामना गमावला तर स्पर्धेतून आऊट होणारा पहिला संघ ठरू शकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनी नाराजी व्यक्त केली आहे.

महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, ‘मला वाटतं आम्ही खूपच सुमार कामगिरी केली, कारण आम्हाला सर्वांना माहित होतं की दुसऱ्या हाफमध्ये दव पडेल. आम्ही मधल्या षटकांचा फायदा घेण्याच्या स्थितीत होतो. मला वाटतं की बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम डेथ बॉलरपैकी एक आहे. मला वाटतं की त्यांनी डेथ बॉलिंग लवकर सुरू केली होती, तेव्हा आम्हाला भांडवल करायला हवं होतं आणि आमचा स्लॉग थोडा लवकर सुरू करायला हवा होता. मला वाटतं की काही षटकांमध्ये आम्हाला थोडे जास्त धावा मिळू शकल्या असत्या. आम्हाला त्या धावांची गरज होती कारण दव पडताना १७५ धावा हा योग्य स्कोअर नाही.’

‘आमच्यासमोर असलेले सर्व सामने जिंकायचे आहेत, आम्ही एका वेळी एक सामना खेळतो आणि जर आम्ही काही हरलो तर आमच्यासाठी पुढील वर्षासाठी योग्य संघ निवडणे महत्त्वाचे असेल. तुम्हाला खूप जास्त खेळाडू बदलायचे नाहीत, महत्त्वाचे म्हणजे पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जर तसे झाले नाही तर पुढच्या वर्षासाठी सुरक्षित 11 मिळवणे आणि मजबूत स्थितीत परतू.’, असंही महेंद्रसिंह धोनी म्हणाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.