AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs RR : सुपर ओव्हरही टाय झाल्यास विजयी संघ असा ठरतो, जाणून घ्या नियम

Ipl Super Over Rule : दिल्ली कॅपिट्ल्सने राजस्थान रॉयल्सला 188 धावांवरच रोखल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर विजय मिळवला. समजा सुपर ओव्हरही टाय झाली असती तर विजेता कोणता संघ ठरला असता? जाणून घ्या नियम.

DC vs RR : सुपर ओव्हरही टाय झाल्यास विजयी संघ असा ठरतो, जाणून घ्या नियम
Super Over Ipl RulesImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 17, 2025 | 4:14 PM
Share

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा 16 एप्रिलला खेळवण्यात आला. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला देला. दोन्ही संघांनी 20 ओव्हरमध्ये प्रत्येकी 188-188 धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरी सुटला. त्यानंतर मिचेल स्टार्क याने सुपर ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग करत दिल्लीच्या विजयात योगदान दिलं. ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल या जोडीने 12 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं आणि दिल्लीने पाचवा विजय साकारला. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील ही पहिलीवहिली सुपर ओव्हर ठरली.

क्रिकेट चाहत्यांकडून या सुपर ओव्हरनिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपर ओव्हर टाय झाल्यास काय? सुपर ओव्हर टाय झाल्यास विजेता संघ कोण ठरणार? याबाबत नियम काय आहे? हे जाणून घेऊयात.

सुपर ओव्हर टाय झाल्यास निकाल कसा लावला जातो?

आयपीएल नियमांनुसार, सामना टाय झाल्यानंतर 10 मिनिटांमध्ये सुपर ओव्हरला सुरुवात व्हायला हवी. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाल्यास दुसऱ्या सुपर ओव्हरला 5 मिनिटांच्या आत सुरुवात होणं बंधनकारक आहे. तसेच दुसरी सुपर ओव्हरही टाय झाल्यास पुढील 1 तासात शक्य तितके सुपर ओव्हर खेळवण्यात येतील. मात्र शेवटची सुपर ओव्हर कोणती असेल? हे ठरवण्याचा अधिकार पंचांना असेल. तसेच 1 तासाच्या कालावधीदरम्यान सुपर ओव्हर होणं शक्य नसेल तर मॅच टाय झाल्याच जाहीर केलं जाऊ शकतं.

असा रंगला सुपर ओव्हरचा थरार

सामना बरोबरीत सुटल्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करते. त्यामुळे राजस्थानला पहिले बॅटिंग करावी लागली. मात्र राजस्थानचे दोन्ही फलंदाज रन आऊट झाल्याने त्यांना पूर्ण 6 चेंडूही खेळता आले नाहीत. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 12 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुल या जोडीने 2 चेंडूंआधी पूर्ण केलं.

दिल्लीचा पाचवा विजय

दरम्यान दिल्लीने यासह 18 व्या मोसमात पाचवा विजय साकारला. दिल्लीने आतापर्यंत या हंगामात अक्षर पटेल याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. दिल्लीने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीने पहिले सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर मुंबईने दिल्लीचा विजय रथ रोखला. त्यानंतर आता दिल्लीने सुपर ओव्हरमध्येही कमाल केली आणि विजयी ‘पंच’ लगावला.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन