IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Ireland vs India 1st T20i : कर्णधार लॉर्कन टकर आणि गॅरेथ डेलानी या दोघांनी आयर्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे आयर्लंडला 180 पार मजल मारता आली.

यजमान आयर्लंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्याच टी 20I सामन्यात (Ireland vs India 1st T20i) धमाका केला आहे. आयर्लंडने बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. आयर्लंडसाठी कर्णधार लॉर्कन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. तर गॅरेथ डेलानी यानेही फटकेबाजी केली. गॅरेथ डेलानी याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने गहुकलं. मात्र लॉर्कन आणि डेलानी या दोघांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच आणि जोरदार धुलाई केली. त्यामुळे आयर्लंडला 182 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे आता टीम इंडिया 183 धावांचं आव्हान किती ओव्हरआधी पूर्ण करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या डावात काय झालं?
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोटात अनेक अनुभवी वेगवान आणि फिरकीपटू गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडिया आयर्लंडला 20 ओव्हरआधीच ऑलआऊट करेल असं चाहत्यांना वाटलं होतं. भारतीय गोलंदाजांनी तशीच सुरुवात केली. मात्र त्यात सातत्य ठेवता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला ठराविक अंतराने 4 झटके दिले. रॉस अडायर याने 12 धावा केल्या. हॅरी टॅक्टर याला भोपळाही फोडता आला नाही. टीम टेक्टर याने 12 चेंडूत 17 धावा जोडल्या. तर बेंजामिन कॅलिट्झ याने 15 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे आयर्लंडचा स्कोअर 7.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 51 असा झाला.
त्यानंतर गॅरेथ डेलानी आणि लॉरेन टकर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. तर गॅरेथ डेलानी याने जॉर्ज डॉकरेलसह सहाव्या विकेटसाठी 16 बॉलमध्ये 49 रन्सची पार्टनरशीप केली. लॉरेन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. टकरने 36 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. जॉर्ज डॉकरेलने 19 रन्स केल्या. गॅरेथ डेलानी याने 49 धावा केल्या. लियाम मॅकार्थी याने 7 धावांचं योगदान दिलं. तर मॅथ्यू हम्फ्रीज आयर्लंडच्या डावातील शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. मॅथ्यूने 2 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून हर्षित राणा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येक 2-2 विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे याने 1 विकेट मिळवली. आता टीम इंडिया या विजयी आव्हानाचा कसा पाठलाग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.