IND vs AUS Final | शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलच निमंत्रण दिलं नव्हतं का?

IND vs AUS Final | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करुन सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. फायनलला अनेक मान्यवर उपस्थित होते. सेलिब्रिटींबरोबर बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी, राजकीय नेते हजर होते. पण महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता दिसला नाही.

IND vs AUS Final | शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलच निमंत्रण दिलं नव्हतं का?
sharad pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 1:24 PM

IND vs AUS Final (संदीप राजगोळकर) | भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सामन्याला उपस्थित होते. फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादऐवजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना व्हायला पाहिजे होता, असं मत व्यक्त केलं. सोशल मीडियावर अहमदाबादच्या प्रेक्षकांमुळे टीम इंडियाने सामना गमावला अशी चर्चा रंगली होती. कारण स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी घोषणा दिल्या नाहीत, आरडाओरडा केला नाही. भारतीय संघाच्या कामगिरीत घसरण होत असताना सन्नाटा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच काम अधिक सोपं झालं.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच निमंत्रण नसल्याची माहिती समोर आलीय. शरद पवार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवले असल्याने त्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होते. पण शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलचे निमंत्रण नव्हते, विश्वसनीय नेत्याने ही माहिती दिलीय. शरद पवार, कपिल देव यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरच योगदान दिलय. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला

वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. या लक्ष्याचा ऑस्ट्रेलियाने आरामात पाठलाग केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. तेच टीम इंडियाच तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. टीम इंडियाने 1983 आणि 2011 असं दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Non Stop LIVE Update
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं.
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?.
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल.