AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final | शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलच निमंत्रण दिलं नव्हतं का?

IND vs AUS Final | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करुन सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. फायनलला अनेक मान्यवर उपस्थित होते. सेलिब्रिटींबरोबर बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी, राजकीय नेते हजर होते. पण महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता दिसला नाही.

IND vs AUS Final | शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलच निमंत्रण दिलं नव्हतं का?
sharad pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 21, 2023 | 1:24 PM
Share

IND vs AUS Final (संदीप राजगोळकर) | भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सामन्याला उपस्थित होते. फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादऐवजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना व्हायला पाहिजे होता, असं मत व्यक्त केलं. सोशल मीडियावर अहमदाबादच्या प्रेक्षकांमुळे टीम इंडियाने सामना गमावला अशी चर्चा रंगली होती. कारण स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी घोषणा दिल्या नाहीत, आरडाओरडा केला नाही. भारतीय संघाच्या कामगिरीत घसरण होत असताना सन्नाटा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच काम अधिक सोपं झालं.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच निमंत्रण नसल्याची माहिती समोर आलीय. शरद पवार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवले असल्याने त्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होते. पण शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलचे निमंत्रण नव्हते, विश्वसनीय नेत्याने ही माहिती दिलीय. शरद पवार, कपिल देव यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरच योगदान दिलय. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला

वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. या लक्ष्याचा ऑस्ट्रेलियाने आरामात पाठलाग केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. तेच टीम इंडियाच तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. टीम इंडियाने 1983 आणि 2011 असं दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....